TRENDING:

पावसामुळे तुमच्या पिकांचे नुकसान झालंय का? वेळ न घालवता हे काम तातडीने करून घ्या

Last Updated:

Maharashtra Heavy Rain : राज्यभरात पावसाने गेल्या काही दिवसांपासून कहर केला असून विशेषतः मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दोन ते तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यभरात पावसाने गेल्या काही दिवसांपासून कहर केला असून विशेषतः मराठवाड्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दोन ते तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मका आणि भाजीपाला या पिकांवर पावसाचा जोरदार परिणाम झाला असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
maharashtra weather update
maharashtra weather update
advertisement

खरीप हंगामातील मोठा फटका

खरीप हंगाम 2025 मध्ये मान्सूनचा लहरीपणा स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोर धरल्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे शेतीत पाणी साचून पिके उखडून जाणे, मुळांची कुज, तसेच रोगराई वाढण्याचे प्रमाण वाढले आहे.

पंचनाम्याची गरज

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची नोंद शासनाकडे पोहोचणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या महसूल मंडळातील तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. पिकांचे नुकसान दिसताच पंचनामा करून घेणे ही पहिली पायरी आहे. पंचनाम्याच्या आधारेच पुढे शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो.

advertisement

पीक विमा आणि भरपाई

या हंगामात राज्य शासनाने दिलेला पीक विमा हा अंतिम कापणी अहवालाच्या आधारे दिला जाणार आहे. त्यामुळे पंचनामा करून ठेवणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. एखादे गाव मोठ्या प्रमाणावर बाधित झाले असल्यास त्या गावातील शेतकऱ्यांना विमा तसेच शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून भरपाई मिळण्याची प्रक्रिया गतीमान होते. अतिवृष्टी, पूरस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळू शकतो.

advertisement

शासनाचा सल्ला

मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शासनाच्या कोणत्याही आदेशाची वाट पाहू नये. शेतकरी स्वतःहून पुढाकार घेऊन पंचनाम्यासाठी अर्ज करावा. कारण नुकसानभरपाईसाठी पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य दिले जाते. पंचनामे न झाल्यास भरपाईसाठीची पात्रता राहणार नाही.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन

पिकांचे नुकसान दिसताच त्वरित स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.

advertisement

पंचनाम्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.

कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या मदतीने पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

पीक विमा योजनेबाबत शेतकरी बँक व विमा कंपनीकडून माहिती घ्यावी.

दरम्यान, सध्या मराठवाड्यातील शेतकरी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे चिंतेत आहेत. मात्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पीक विमा योजना, नुकसानभरपाई आणि आपत्ती निवारण निधीचा लाभ घेण्यासाठी पंचनामा करून घेणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी वेळेत योग्य पाठपुरावा केल्यास त्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो आणि खरीप हंगामातील मोठा फटका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
पावसामुळे तुमच्या पिकांचे नुकसान झालंय का? वेळ न घालवता हे काम तातडीने करून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल