TRENDING:

Morning Astro: आता सर्वांनाच गरज आहे! ब्रह्ममुहूर्तावर केलेली 4 कामे दिवसभर परिणाम दाखवतात

Last Updated:

Religious Marathi: आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्म मुहूर्ताला अमृतवेळ असंही म्हटलं आहे. ब्रह्म मुहूर्त साधारणपणे पहाटे ४ वाजता सुरू होतो आणि सुमारे ५.३० वाजेपर्यंत असतो. असे मानले जाते की या काळात केलेल्या कामाचे फळ देखील खूप शुभ असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ब्रह्म मुहूर्तावेळी वैश्विक ऊर्जा अत्यंत सकारात्मक असते. म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी ब्रह्म मुहूर्ताला अमृतवेळ असंही म्हटलं आहे. ब्रह्म मुहूर्त साधारणपणे पहाटे ४ वाजता सुरू होतो आणि सुमारे ५.३० वाजेपर्यंत असतो. असे मानले जाते की या काळात केलेल्या कामाचे फळ देखील खूप शुभ असते. तसेच, अशी काही कामे आहेत जी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी केल्यानं आपल्याला संपत्ती आणि कौटुंबिक सुख मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देत आहोत.
News18
News18
advertisement

स्नान आणि देवाचे स्मरण -

ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर स्नान करून देवाचं स्मरण केलं पाहिजे. आपण या काळात तुमच्या इष्ट देवाचे स्मरण केले आणि त्याची पूजा केली तर तुमच्या घरात समृद्धी येते. यासोबतच, पितृदोष देखील दूर होतो. ब्रह्म मुहूर्तावर देवाची पूजा केल्याने तुमची आध्यात्मिक शक्ती देखील वाढते आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.

advertisement

तळहाताचे दर्शन

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, देव-देवता आपल्या तळहातावर वास करतात. ब्रह्म मुहूर्तावर उठल्यावर सर्वप्रथम हाताचे तळवे पाहिले तर आपल्याला शुभ परिणाम मिळतात. तळहातांकडे पाहताना तुम्ही खाली दिलेल्या मंत्राचा जप करावा.

'ॐ काराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविंदा, प्रभाते करदर्शनम्।'

या मंत्राचा अर्थ असा आहे की, माता सरस्वती तळहाताच्या वरच्या भागात वास करते, माता लक्ष्मी तळव्याच्या मध्यभागी वास करते आणि श्री हरीदेखील स्वतः तळव्यात वास करतात. यासाठी सकाळी उठल्यावर आपले तळहात पाहावे. या मंत्राचा जप आणि दररोज तळहात पाहिल्यानं धन आणि कौटुंबिक आनंद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

advertisement

श्रावण सोमवारी अशी करतात विधीपूर्वक पूजा; या मंत्रांचा अखंड करावा जप शुभफळ

योग आणि ध्यान - योगासनांमुळे शरीर निरोगी बनवते, तर ध्यान मानसिक स्थिरता देते. यासाठीच सकाळी योग आणि ध्यान देखील केले पाहिजे. आध्यात्मिक विकासात लाभ मिळतो. यामुळे तुम्ही जीवनात प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता.

मंत्रांचा जप - जर तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर दररोज मंत्राचा जप करण्याचा आणि त्याचा जप करण्याचा संकल्प केला तर तुम्हाला लाभ होईल. मंत्र सिद्ध झाल्यावर तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता, आणि मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला मानसिक शांती देखील मिळते. ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी तुम्ही गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र इत्यादींचा जप करू शकता.

advertisement

शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Morning Astro: आता सर्वांनाच गरज आहे! ब्रह्ममुहूर्तावर केलेली 4 कामे दिवसभर परिणाम दाखवतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल