TRENDING:

Raigad: 12 दिवस लॉजवर राहिला, 13 व्या दिवशी करुण अंत, आरावी बीचवर सापडला मृतदेह

Last Updated:

Raigad News: रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील आरावी समुद्रकिनारी एका पुरुषाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिनेश पिसाट, दक्षिण रायगड: रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील आरावी समुद्रकिनारी एका पुरुषाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती गेल्या १२ दिवसांपासून श्रीवर्धनमधील एका लॉजवर राहत होता, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे हत्या की आत्महत्या, याचे गूढ वाढले आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन पोलिसांना आरावी समुद्रकिनारी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची तपासणी केली असता, त्याच्या खिशात एक आधार कार्ड सापडले. त्यावरून त्याचे नाव सचिन खोडवे असून तो मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांना मृतदेहाजवळ श्रीवर्धन शहरातील एका लॉजची पावतीही सापडली. या पावतीनुसार, सचिन गेल्या १२ दिवसांपासून या लॉजवर मुक्कामी होता. तो इतके दिवस श्रीवर्धनमध्ये का थांबला होता, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

advertisement

सचिन खोडवे यांची हत्या झाली आहे की त्याने आत्महत्या केली आहे, याबाबतचे गूढ कायम आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस अधिक तपास करत असून, सचिनच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
Raigad: 12 दिवस लॉजवर राहिला, 13 व्या दिवशी करुण अंत, आरावी बीचवर सापडला मृतदेह
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल