मेघालयचे मंत्री का नाराज आहेत?
राजाच्या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या पत्रात मेघालय पोलीस आणि सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. ज्यामुळे मंत्री हेक नाराज झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी या प्रकरणात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ज्यात सोनमची अटक आणि इतर आरोपींना ताब्यात घेणे समाविष्ट आहे. मंत्र्यांनी कुटुंबाच्या आरोपांना मेघालयच्या प्रतिमेवरील हल्ला म्हटले आहे. या प्रकरणामुळे केवळ गुन्हेगारी तपासच नव्हे, तर राज्याच्या प्रतिष्ठेवरही चर्चा सुरू झाली आहे. सोनमला गुवाहाटीला आणले जात असून, तपास पुढे सुरू आहे.
advertisement
मर्डर करून इंदूरला आली सोनम, बॉयफ्रेंडसोबत एका रुमवर रात्रभर...; मग तिने जे केले
सोनमने प्रियकरासोबत केली पतीची हत्या
मंत्री हेक यांनी स्पष्ट केले की, ही घटना मेघालयमध्ये घडली असल्याने आरोपींना इथेच आणले जाईल. तपास राज्य पोलीस, केंद्रीय पोलीस किंवा कोणत्याही तपास संस्थेला सोपवण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु सत्य आधीच समोर आले आहे. पोलिसांचा दावा आहे की, राजा रघुवंशीची पत्नी सोनम (25) पतीच्या हत्येत सामील होती. तिने उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यातील नंदगंज पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. त्यानंतर मेघालय पोलिसांनी तिला अटक केली.
पोलिसांनुसार 11 मे रोजी राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर ते हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. तिथे सोनमने कॉन्ट्रॅक्ट किलर्सच्या मदतीने पतीची हत्या करवून घेतली. सोनमचे कथितपणे कुशवाहा नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. 23 मे रोजी हे जोडपे बेपत्ता झाले होते आणि 2 जून रोजी राजाचा मृतदेह मेघालयच्या सोहरा (चेरापुंजी) परिसरात एका धबधब्याजवळ खोल दरीत आढळला होता.