TRENDING:

'खेळायलाच नको हा पर्याय नाही', IND vs PAK सामन्यावरून सुनील अण्णाचा खेळाडूंना पाठिंबा

Last Updated:

India vs Pakistan Cricket Match : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सुनील शेट्टी यांनीही यावर एक खूपच स्पष्ट आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी खेळाडूंच्या बाजूने आपलं मत मांडलं आहे, जे खूपच चर्चेत आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हटलं की, देशात एक वेगळाच माहोल तयार होतो. अशातच, या मॅचबद्दल प्रत्येकजण आपापलं मत मांडताना दिसतो. आता बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सुनील शेट्टी यांनीही यावर एक खूपच स्पष्ट आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यांनी खेळाडूंच्या बाजूने आपलं मत मांडलं आहे, जे खूपच चर्चेत आलं आहे.
News18
News18
advertisement

हा तुमचा निर्णय आहे

एशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅचबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाले, “ही एक जागतिक क्रीडा संस्था आहे. त्यांना नियमांचं पालन करावंच लागतं. कारण, यात फक्त क्रिकेटच नाही, तर इतरही अनेक खेळ आणि खेळाडू सामील आहेत.”

'माझ्या लोकांचं रक्त सांडलं...', INDvsPAK सामन्याबाबत नाना पाटेकरांची रोखठोक भूमिका, कडाडून केला विरोध

advertisement

पण, त्यांनी एक खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, “एक भारतीय म्हणून मला वाटतं की, हा एक वैयक्तिक निर्णय आहे, जो आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला मॅच पाहायची आहे की नाही? आपल्याला तिकडे जायचं आहे की नाही? हा निर्णय भारताला घ्यायचा आहे.”

खेळाडूंना दोष देऊ नका!

सुनील शेट्टींनी खेळाडूंना पाठिंबा देत म्हटलं, “तुम्ही क्रिकेटर्सना खेळण्यासाठी दोष देऊ शकत नाही. कारण, ते खेळाडू आहेत. त्यांच्याकडून देशाचं प्रतिनिधित्व करण्याची अपेक्षा केली जाते.” ते म्हणाले की, हा निर्णय क्रिकेटर्सना नाही, तर आपल्याला घ्यायचा आहे. सुनील शेट्टी म्हणाले, “तुम्ही प्रत्येकाने काय करायचं आहे, हे तुम्हीच ठरवा. हा बीसीसीआयच्या हातात नाही. तुम्ही कोणालाही दोष देऊ शकत नाही.” सुनील शेट्टीच्या या स्पष्ट भूमिकेचं आता खूप कौतुक होत आहे, कारण त्यांनी खेळाडूंची बाजू योग्य प्रकारे मांडली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'खेळायलाच नको हा पर्याय नाही', IND vs PAK सामन्यावरून सुनील अण्णाचा खेळाडूंना पाठिंबा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल