ऐश्वर्या रायशी लग्न करण्यासाठी मौलवीचा प्लॅन
हा संपूर्ण वाद ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या वैवाहिक जीवनात तणाव असून, त्यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या अफवांमुळे सुरू झाला होता. याच अफवेचा फायदा घेत एका पाकिस्तानी मौलवीने एका मुलाखतीदरम्यान आपला किळसवाणा प्लॅन उघड केला. कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता, हा मौलवी जाहीरपणे ऐश्वर्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो, पण त्यासाठी तिचे धर्म परिवर्तन करण्याची योजना सांगतो.
advertisement
तो व्हिडिओमध्ये म्हणतो, "पहिले ऐश्वर्या रायला मुस्लीम बनवा, मग निकाह करू. ऐश्वर्या रायपेक्षा जास्त सुंदर नाव 'आएशा राय' असं ठेवू, मजा येईल." तो स्वतःला 'मुफ्ती साहब' म्हणवून घेतो आणि पुढे हसत म्हणतो, "अल्लाहकडून येणाऱ्या प्रत्येक देणगीसाठी तयार राहणे, हेच माझ्या इस्लामचे सौंदर्य आहे."
राखी सावंतचा घेतला आधार
मुलाखत घेणाऱ्याने, "मुफ्ती साहब, तुम्ही गैर-मुस्लिमशी कसे लग्न करू शकता?" असा प्रश्न विचारताच मौलानाने राखी सावंतचा उल्लेख करून विषयावरून पळ काढला. तो हसत उत्तर देतो, "ओ हो... ही जी आमची राखी सावंत आहे, तिचे नाव आता फातिमा आहे." अशा प्रकारे त्याने वादग्रस्त अभिनेत्री राखी सावंतचा उल्लेख करत भारतीय कलाकारांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला आहे.
चाहत्यांच्या संतापाचा उद्रेक
हा अपमानजनक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला असून तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. त्यावर भारतीय चाहत्यांनी तीव्र टीका केली आहे. एका यूजरने आपला राग व्यक्त करत म्हटले, "आणि याच्यासाठी ती मुस्लिम होईल? काहीही बोलतात हे लोक." तर दुसऱ्याने "खबीसची शक्ल आहे याची, लाज बाळगा," अशा कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली. एका चाहत्याने गमतीने म्हटले, "आता सलमान भाईला सांगतो, बघतो काय होतंय." मौलवीचे हे विधान पाकिस्तानमधील काही वर्गाची संस्कृती आणि मानसिक मागासलेपण दर्शवत असल्याचा आरोप अनेक भारतीय युजर्सनी केला आहे.
