...तर लग्न कशाला करता?
श्वेता शिंदेने आजच्या काळातील एका विदारक वास्तवावर बोट ठेवलंय. ती म्हणते, "आजकाल मुलींची पहिली मागणी असते की मुलाकडे स्वतःचं घर हवं. पण मला सांगा, वयाच्या पंचविसाव्या वर्षी एखाद्या मुलाकडे स्वतःचा फ्लॅट कसा असेल? त्याच्या करिअरची तर ती नुकतीच सुरुवात असते."
advertisement
श्वेताने पुढे अत्यंत मार्मिक प्रश्न विचारला की, जर मुलाच्या आई-वडिलांनीच पैसे देऊन त्याच्या नावावर घर बुक करायचं असेल आणि त्यानंतर मुलगी लग्नाला 'हो' म्हणणार असेल, तर त्या मुलीचं त्या संसारात योगदान काय? तिने स्पष्ट शब्दांत सुनावलं की, "जर तुम्हाला सर्व काही ताटात वाढूनच हवं असेल, तर मग लग्न कशाला करता? संसार म्हणजे दोघांनी मिळून शून्य उभं करणं असतं."
श्वेताने टोचले मुलींचे कान
श्वेताच्या मते, लग्नानंतर दोघांनी मिळून कष्ट करावेत, पैसे साठवावेत आणि मग एखादं घर घ्यावं. त्या घराच्या वास्तूशांतीच्या पूजेला जेव्हा दोघं जोडीने बसतात, तेव्हा जो आनंद मिळतो, तो तयार घरात जाण्यात कधीच नसतो. "मिळून घर खरेदी करा, एकमेकांना साथ द्या, त्यात खरी गंमत आहे," असं म्हणत तिने संघर्षातून मिळणाऱ्या यशाचं महत्त्व पटवून दिलं.
मुलीच्या पालकांनाही आरसा दाखवला!
केवळ मुलींनाच नाही, तर त्यांच्या पालकांनाही श्वेताने खडे बोल सुनावले आहेत. तिने विचारलं की, "मुलीच्या आई-वडिलांनी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारावा की, जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं किंवा जेव्हा ते २५ वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्याकडे स्वतःचं घर किंवा कार होती का?" तिने पालकांना सल्ला दिला की, घराची अपेक्षा करण्यापेक्षा मुलाचं कर्तृत्व बघा. मुलगा सज्जन आहे का? तो निर्व्यसनी आहे का? त्यात पैसा कमवण्याची जिद्द आहे का? हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण जे घर मुलाच्या वडिलांनी विकत घेतलंय, त्यावर त्या मुलाचं कर्तृत्व सिद्ध होत नाही.
श्वेता शिंदेचा हा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. विशेषतः तरुण मुलांनी श्वेताचे आभार मानले आहेत, कारण लग्नाच्या बाजारात घर नसल्यामुळे अनेक मुलांची लग्नं रखडली आहेत. श्वेताने मांडलेले हे विचार आजच्या पिढीसाठी एक रिॲलिटी चेक ठरत आहेत.
