साजिद खानने एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की बिग बॉस ७ ची विजेती आणि अभिनेत्री गौहर खान आणि तो रिलेशनशिपमध्ये होते. एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी साखरपुडाही केला होता. इतकंच नाही तर एका वृत्तसंस्थेने त्यांचा साखरपुडा कव्हरही केला होता. मग असं काय झालं की त्यांचा अचानक ब्रेकअप झाला. साजिद खानने याचं कारण सांगत स्वतःला यासाठी कारणीभूत ठरवले होते.
advertisement
Dashavatar : सचिन पिळगांवकर तुम्हाला सिनिअर आहेत का? दिलीप प्रभावळकरांचं उत्तर ऐकून सगळेच शॉक
साजिदने सांगितलं गौहर खानसोबत लग्न मोडण्याचं कारण
साजिद म्हणाला, गौहर खूपच चांगली मुलगी आहे. पण त्यावेळी माझं कॅरेक्टर चांगलं नव्हतं. मी तिला खोटं सांगून अनेक मुलींसोबत फिरायचो. मी काही चुकीचं काम केलं नाही, पण मी प्रत्येक मुलीला 'आय लव्ह यू, व्हील यू मॅरी मी?' म्हणायचो. त्यानुसार आतापर्यंत माझी ३५० लग्न व्हायला हवी होती, पण ती नाही झाली. मला खात्री आहे की, मी जितक्या मुलींसोबत होतो, त्यातल्या काही माझी अजूनही आठवण काढत असतील, तर काही मला शिव्या देत असतील.
दरम्यान, साजिदसोबतचं नातं तुटल्यानंतर गौहर खानने रिॲलिटी शोच्या दुनियेत नाव कमावलं. तिने बिगबॉस ७ शो जिंकला. या शोमध्ये ती कुशाल टंडनच्या प्रेमात पडली होती, मात्र शो संपल्यानंतर त्यांचं नातंही संपलं. २०२० साली गौहरने जैद दरबारशी लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत.