TRENDING:

कंपनीच्या CEO पेक्षा जास्त कमवतोय जालन्याचा पाणीपुरीवाला, नफा पाहून तोंडात बोटं घालाल

Last Updated:

Panipuri Business: जालन्यातील काशिनाथ गवळी हे गेल्या 18 वर्षांपासून पाणीपुरीचा स्टॉल चालवतात. इथं रोज खवय्यांच्या रांगा लागतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नारायण काळे, प्रतिनिधी
advertisement

जालना: जगभरात पाणीपुरीचे असंख्य चाहते आहेत. पाणीपुरी हा अनेकांचा वीक पॉईंट असतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना पाणीपुरी हा पदार्थ प्रचंड आवडतो. विशेषतः महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेली पाणीपुरी उत्तर भारतातील स्ट्रीट फूड आहे. पाणीपुरीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिलेच असतील. जालना शहरात मिळणारी जय संताजी पाणीपुरी देखील अशीच खास आहे. गेल्या 18 वर्षांपसून काशिनाथ वामनराव गवळी हे हा स्टॉल चालवत असून इथं खवय्यांची मोठी गर्दी होते. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

advertisement

सायंकाळी 4 वाजल्यानंतर जालनाकरांची पाऊले आपसूक जय संताजी पाणीपुरी सेंटरकडे वळू लागतात. जालना शहरात 18 वर्षांपूर्वी काशिनाथ वामनराव गवळी यांनी छोटासा पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला गल्लोगल्ली फिरून ते पाणीपुरी विक्रीचं काम करायचे. दिवसभर भटकंती केल्यानंतर 200 ते 250 रुपयांचा व्यवसाय त्यांचा व्हायचा. परंतु व्यवसायाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिक कष्ट, यामुळे ते या व्यवसायात टिकून राहिले. ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार पाणीपुरी मध्ये बदल करत गेले. आज त्यांची दिवसाला 3 ते 4 हजार रुपयांची कमाई या पाणीपुरी व्यवसायातून होते, असं गवळी सांगतात.

advertisement

महाराष्ट्रातलं रताळ्यांचं गाव! तब्बल 100000000 रुपयांची उलाढाल, महाशिवरात्रीला तर...

कशी बनवतात पाणीपुरी?

रवा आणि मूग डाळीपासून चवदार पुरी घरीच बनवली जाते. तर जिरे, कोथिंबीर, पुदिना, शहाजीरा असे वेगवेगळे अस्सल मसाले घालून तयार केलेलं तिखट आणि चिंचेचं गोड पाणी खवय्यांना आकर्षित करतं. त्याचबरोबर पाणीपुरीसाठी वापरण्यात येणार आरो फिल्टर पाणी, स्टॉलवरची स्वच्छता आणि आपलेपणाची दोन शब्द यामुळे आपला ग्राहक वर्ग टिकून असल्याचं गवळी सांगतात.

advertisement

खवय्यांची गर्दी

जालना शहरातील भाग्यनगर, देव मूर्ती, मोतीबाग, रेल्वे स्टेशन, मामा चौक यासारख्या परिसरातून लोक पाणीपुरी खाण्यासाठी या ठिकाणी येतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील खेडेगावांमधून देखील कामानिमित्त आलेले लोक आवर्जून या ठिकाणची पाणीपुरी खाऊनच घरी जातात. लग्न सराईच्या सीझनमध्ये अडीच ते तीन लाखांचे ऑर्डर्स देखील काशिनाथ गवळी यांना मिळतात.

3 ते 4 हजारांची कमाई

advertisement

मागील 18 वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. ग्राहकांशी व्यवहार व्यवस्थित ठेवला. चांगल्या प्रतीचा दर्जेदार खाद्यपदार्थ ग्राहकांना दिल्यास ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो. आपली पाणीपुरी कशी आहे? हे ग्राहकच त्यांच्या तोंडून सांगतात. 15 रुपयांना पाणीपुरीची प्लेट विकतो. या व्यवसायातून दिवसाला 3 ते 4 हजारांचा नफा आरामात होतो, असं काशिनाथ गवळी यांनी सांगितलं.

ग्राहक म्हणतात..

आम्ही मोती गव्हाण या गावावरून पाणीपुरी खाण्यासाठी इथे आलो आहोत. या पाणीपुरीची आणि पाण्याची चव अत्यंत चवदार आहे. त्यामुळे कामानिमित्त जालना शहरात आल्यानंतर आम्ही इथे आवर्जून पाणीपुरी खातो, असं ग्राहक कैलास मोहिते यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
कंपनीच्या CEO पेक्षा जास्त कमवतोय जालन्याचा पाणीपुरीवाला, नफा पाहून तोंडात बोटं घालाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल