तुम्हालाही दिवाळीनंतर वाढत्या वजनाची चिंता वाटत असेल तर, पाच सोप्या आणि प्रभावी टिप्स नक्की वापरा. या लेखात दिलेल्या टिप्स वापरल्या तर जास्त खाणं टाळता येईल.
जाणीवपूर्वक खा - ही सर्वात महत्वाची टीप आहे. जेवताना केवळ अन्नावर लक्ष केंद्रित करा. टीव्ही किंवा मोबाईल फोन पाहत असताना जेवू नका. अन्न हळूहळू चावा आणि त्याची चव चाखा. यामुळे तुमच्या मेंदूला पोट लवकर भरल्याचे संकेत दिले जातील आणि गरजेपेक्षा जास्त खाणं टाळता येईल.
advertisement
Diwali : दिवाळीत गोड खायचं की नाही ? दिवाळीत मधुमेह नियंत्रण कसं कराल ?
पाणी पिणं - आपण अनेकदा तहान आणि भूक यांचा गोंधळ करतो. म्हणून, जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा प्रथम एक ग्लास पाणी प्या. जेवणाच्या वीस-तीस मिनिटं आधी एक ग्लास पाणी प्यायल्यानं तुम्हाला कमी खाण्यास मदत होईल. पाण्यामुळे पचन सुधारण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होईल.
लहान ताट वापरा - ही एक मानसिक युक्ती आहे. लहान ताटात अन्न वाढल्यानं तुमच्या मेंदूला असं वाटतं की तुम्ही जास्त खाल्लं आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या जेवणाचा आकार अधिक सहजपणे नियंत्रित करण्यास मदत होईल.
निरोगी पर्यायांचा अवलंब करा - पार्ट्यांमधे केवळ तळलेले पदार्थ आणि साखरेचे पदार्थ खाण्यावर अवलंबून राहू नका. घरी काही निरोगी पर्यायी पदार्थ बनवू शकता, उदा- भाजलेला मखाणा, भाजलेले चणे किंवा फ्रूट सलाड.
Diwali : दिवाळीसाठी खास स्किन केअर टिप्स, सोपे - पटकन करता येणारे फेसपॅक
जेवणानंतर फिरा - दिवाळीच्या मेजवानीनंतर थोडं चालणं खूप फायदेशीर आहे. दहा-पंधरा मिनिटं चालण्यानं पचनसंस्था सुधारू शकते आणि शरीर जड वाटणार नाही. कुटुंबासह थोडं चालायला जाऊ शकता; यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होईल आणि तुम्ही सक्रिय राहाल.
दिवाळी हा सण आनंदाचा, दिव्यांचा आहे, दिवाळीच्या आनंदात, आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. या सोप्या आणि स्मार्ट पद्धतींचा अवलंब करून, कोणत्याही अपराधीपणाशिवाय सणाचा आनंद घेता येईल.
