गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव गावात ही दुदैवी घटना घडली आहे.इमरान इसाक शेख हा दसऱ्यानिमित्त आज दुपारी शेतालगत असलेल्या गायरान जमिनीमधील मुरूम उपसल्यानंतर पडलेल्या खड्ड्याच्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत कुटुंबातील इमू पठाण, जोहान पठाण आणि गौरव तारक ही तीन लहान मुले होती. ट्रॅक्टर धुवून झाल्यानंतर ही तीन लहान मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. अचानक ती मुले उडत असल्याचे बघून इमरान त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र पाणी जास्तच खोल असल्यामुळे चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
advertisement
या तलावात ट्रॅक्टर धुताना पाण्याचा अंदाज आल्याने 4 मुलांचा मृत्यू झाला होता. व्यंकटेश दत्तात्रस तारक (वय 11), इरफान इसाक शेख (वय 17), इम्रान इसाक शेख (वय 12) आणि जैनखान हयात खान पठाण अशी या तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहे. या मुलांमध्ये दोन भाऊ असल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना एका प्रत्यक्षदर्शीने पाहताच तत्काळ गावकऱ्यांना आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. या घटनेनंतर गावकऱ्यांनी आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर गावात एकच शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.