महाराष्ट्रातल्या कृषी संस्कृतीचा आधारस्तंभ असलेल्या लाकडी अवजारांना एक मोठा इतिहास आहे. लाकडी नांगर, कुदळ, पाभर, वखर, कोळपे ही अवजारे शेतीकामांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. ती केवळ मातीशी जोडलेली नव्हती, तर ती शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती. पण काळानुसार बदलणाऱ्या तंत्रज्ञानाने आणि उत्पादनक्षमतेच्या वाढीमुळे आता लोखंडी अवजारांनी त्यांची जागा घेतली आहे. लोखंडी अवजारे टिकाऊ, कमी देखभालीची आणि वेगवान असल्याने शेतकऱ्यांचा कल तिकडे वाढला आहे.
advertisement
Agriculture Success: इराण सोडा, आपल्या मराठवाड्यात पिकलं खजूर, 20 लाखांची होणार कमाई
छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्रात, पिढ्यानपिढ्या लाकडी शेती अवजारे बनवणाऱ्या कारागिरांवर आज उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले आहे. ज्यांच्या हातांना लाकूडकामाची सवय होती, ज्यांच्या कलाकुसरीवर शेती अवलंबून होती, ते कारागीर आज बेरोजगार झाले आहेत. अनेक वर्षांची त्यांची कला आणि कौशल्य आता निरुपयोगी ठरत आहे. आम्ही लहानपणापासून हेच काम करत आलो आहोत, पण आता बाजारात आमची गरजच राहिली नाही. त्यामुळे विविध प्रकारचे दरवाजे, डिझाइन्स चौकटी असे काम करत असल्याचे लाकडी अवजारे बनवणारे कारागीर सांगतात.





