सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत ही माहिती देण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत महसूल, आरोग्य आणि महानगरपालिका विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. प्रशासनाकडून आतापर्यंत 150 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आणखी 30 ते 40 जणांवर लवकरच कारवाई होणार आहे.
पुणेकरांनी आकाशात असं काय पाहिलं? लोकांनी थांबून काढले फोटो
advertisement
सोमय्यांनी या प्रकरणात बांगलादेशी नागरिकांना बोगस प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच, सिल्लोड तालुक्यातील 234 संशयित व्यक्तींविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व रद्द केलेली प्रमाणपत्रे परत घेण्यासाठी विशेष समिती स्थापन केली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.






