27 वर्षांच्या तरुणावर सुरुवातीला आयसीयूमध्ये आणि त्यानंतर अस्थिव्यंगोपचार विभागात सुमारे साडेतीन महिने सलग उपचार सुरू राहिले. टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया व पुनर्वसनामुळे हा तरुण आता बरा होत असून पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतोय. हा तरुण मूळचा विशाखापट्टणम येथील रहिवासी आहे.
चालत्या बसमध्ये पोट दुखायला लागलं, जिनं जागा दिली तिच्यासोबतच भयंकर घडलं, बीडमध्ये खळबळ
advertisement
30 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेनंतर मणक्याला इजा झाल्याने त्याच्या पायांची ताकद कमी झाली होती. अधिष्ठात्यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंगोपचार विभागाच्या पथकाने मणका, मांडी व घोट्यांवर आवश्यक शस्त्रक्रिया करून उपचार केले. भूलतज्ज्ञ, ओटी व वॉर्ड कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी महत्त्वाची साथ दिली.
दरम्यान, निवासी डॉक्टरांनी तरुणाच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. अभ्यासाच्या ताणामुळेच मुलाने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे वडिलांनी सांगितले. विशाखापट्टणम येथून तो कसा येथे पोहोचला, हे कुटुंबालाही ठाऊक नव्हते. “घाटीतील डॉक्टरांच्या वेळीच व कुशल उपचारांमुळे आमचा मुलगा वाचला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.






