देशातील 53 रेल्वे मार्गांवर ताशी 130 कि.मी. वेगाने रेल्वे चालविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या 53 मार्गांमध्ये छत्रपती संभाजीनगर ते मनमाड मार्गाचा समावेश आहे. सध्या या मार्गावर ताशी 100 कि.मी. वेगाने रेल्वे धावतात. हा वेग 130 कि.मी. पर्यंत वाढणार आहे.
advertisement
Weather Alert: तुफान आलंया! राज्यात गुरुवारी वादळी पाऊस, 14 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट
तब्बल दीड वर्षांनंतर रेल्वे सुसाट..!
रेल्वे रुळांवर अचानक पाळीव जनावरे येण्याची समस्या मोठी आहे. रेल्वेच्या वेग वाढीत ही बाब अडचणीची ठरते. त्यामुळे आता रेल्वे रुळाच्या कडेने संरक्षण भिंत-कुंपण तयार करण्यासाठी दमरेच्या नांदेड विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या कामासाठी 18 महिन्यांची मुदत असणार आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर रेल्वेचा वेग वाढेल.
राज्यात येथे आहे 130 कि.मी. वेग
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सीएसएमटी ते कसारा, कर्जत दरम्यान तसेच अहमदनगर ते मनमाड द्रुतगती रेल्वे मार्ग प्रकल्पांतर्गत निंबळक ते वांबोरी रेल्वे मार्ग आणि भुसावळ ते इगतपुरी विभाग पुणे ते दौंड आणि नांदेड सिकंदराबाद मार्गावर काही रेल्वे गाड्या 130 किलोमीटर वेगाने धावतात.






