पाणी मिळण्याचे टप्पे सरकत असून, आधी सात-आठ दिवसांनी मिळणारे पाणी आता दहा दिवसांनंतर मिळत आहे. त्यामुळे सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे हाल वाढले आहेत.
चलो दिल्ली... छ. संभाजीनगरहून दिवसाला 3 विमानसेवा, हैदराबादसाठी पुन्हा उड्डाण, पाहा वेळापत्रक
'जल बेल' अपयशी, माहितीचा अभाव
छत्रपती संभाजीनगर मनपाकडून उपलब्ध करून दिलेले 'जल बेल' अॅपदेखील नागरिकांच्या उपयोगाचे ठरत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अॅपवर अद्ययावत माहिती नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत.
advertisement
या भागांमध्ये पुरवठा विस्कळीत
गारखेडा, रेल्वे स्टेशन, चिकलठाणा, सिडको, हडको आणि जुन्या शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे. जुनी पाणीपुरवठा यंत्रणा आणि सातत्याने येणाऱ्या अडचणींमुळे मनपाचे नियोजन अडथळ्यांत सापडले आहे.
दरम्यान, या वारंवार होणाऱ्या पाणीटंचाईविरोधात नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने यावर स्थायी उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.