जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान टाकण्यात येणाऱ्या या मुख्य जलवाहिनीतील 130 मीटर गॅपपैकी सध्या फक्त 35 मीटरची जोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित 95 मीटरचे काम टाकळी परिसरात सुरू असून ते तांत्रिकदृष्ट्या अत्यंत किचकट असल्याचे समजते. त्यामुळे जुन्या 900 मिमी पाईपलाईनवर देण्यात आलेला शटडाऊन अपेक्षेपेक्षा जास्त लांबला आहे.
advertisement
एमजेपीच्या सूत्रांनुसार, उर्वरित जोडणीसाठी शटडाऊनची आवश्यकता नाही; मात्र टाकळी येथील कठीण काम पूर्ण होईपर्यंत पाणीवाहिनी सुरू करता येणार नाही. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, शटडाऊन वाढल्याने शहरातील पाणीपुरवठा अधिकच विस्कळीत झाला आहे. अनेक भागांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत असून, नागरिकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. घरगुती वापरापासून हॉस्पिटल्स, हॉटेल्स आणि व्यवसायांपर्यंत याचा व्यापक परिणाम जाणवत आहे.
नागरिकांची प्रतीक्षा वाढत असताना, प्रशासन पुढील दोन दिवसांत काम पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.






