सोनवणे सांगतात की, रोपांच्या वाढीसाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात रोपांना सकाळ-संध्याकाळ पाणी दिल्यास रोपांची वाढ उत्तम होते. याउलट पावसाळ्यात रोपांमध्ये जास्त पाणी साचू नये, याची काळजी घ्यावी लागते. पाणी जास्त झाल्यास रोपांची आणि झाडांची मुळं सडतात आणि झाडाची वाढ देखील खुंटते. त्यामुळे शेती असो किंवा बाग ड्रेनेजची व्यवस्था नेहमी योग्य असली पाहिजे.
advertisement
Farmer Success Story: शेतकऱ्याची कमाल, 5 गुंठ्यात केली पैसे देणारी शेती, 45 दिवसात मिळाले 1 लाख!
रोपांची निरोगी वाढ व्हावी यासाठी मातीचं मिश्रण व खतांचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. लाल माती, वाळू व शेणखत या तिन्हींचे संतुलित मिश्रण झाडांसाठी उत्तम ठरते. तसेच सेंद्रिय खतांचा वापर केल्यास रोपांची वाढ चांगली होते आणि त्यांचा दर्जाही सुधारतो. रोपांना वेळोवेळी आवश्यक खतं दिल्यास त्यांची वाढ अधिक जोमाने होते.
किड व रोग नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करण्याचा सल्ला सोनवणे यांनी दिला आहे. सोनवणे म्हणाले, "जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यास रोपांचं नुकसान न होता कीड नाहीशी होते. काही झाडांना नियमित छाटणीची आवश्यकता असते. छाटणीमुळे रोपाचा आकार व वाढ नियंत्रित राहतो आणि ग्राहकांना दर्जेदार रोपं मिळतात."
रोपांसाठी सूर्यप्रकाश व सावली यांचा समतोल राखणंही फार गरजेचं आहे. फळझाडांना भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो तर शोभेची व औषधी झाडे मध्यम सावलीत चांगली वाढतात. दीपक सोनवणे म्हणाले, "नर्सरी व्यवसाय हा फक्त रोपे विकण्यापुरता मर्यादित नाही. या व्यवसायात शिस्तबद्ध देखभाल, योग्य ज्ञान आणि रोपांप्रती प्रेम आवश्यक आहे. तेव्हाच यश मिळते."