Farmer Success Story: शेतकऱ्याची कमाल, 5 गुंठ्यात केली पैसे देणारी शेती, 45 दिवसात मिळाले 1 लाख!
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
शेतीचे क्षेत्रफळ कितीही असो, त्यामध्ये योग्य प्रकारे पिकाची माहिती घेऊन लागवड केल्यास अधिक उत्पन्नही मिळवता येते. शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सेंद्रिय पद्धतीने मिरचीची लागवड केल्या असल्यामुळे बाजारात देखील चांगला दर मिळत आहे. पाच गुंठ्यातून ज्ञानेश्वर यांनी 10 ते 15 बॅग मिरचीच्या विक्री केल्या असून आतापर्यंत त्यांना लागवडीचा खर्च वजा करून 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे. तसेच ज्ञानेश्वर हिप्परकर हे स्वतः आठवडी बाजारात जाऊन हिरवी मिरचीची विक्री करत आहेत.
advertisement
advertisement
दहा आणि पाच-पाच गुंठ्यामध्ये पालेभाज्यांची लागवड करण्याचे एकच कारण, आठवडी बाजारात किंवा दररोज तोडा करून याची विक्री करता येते आणि रोजचा रोज उत्पन्न मिळते. जमिनीचे योग्य नियोजन करून पालेभाज्यांची पिकं घेतल्यास शेतकऱ्यांना उसाचे बिल हाती येण्याआधी पालेभाज्या विक्रीतून आपल्याला अधिकाधिक उत्पन्न मिळेल, असे मत ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी व्यक्त केले आहे.