TRENDING:

आजचं हवामान: पावसाची आज विश्रांती पण 8 जिल्ह्यांचं टेन्शन कायम, हवामान विभागाने दिली अपडेट

Last Updated:

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा, सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि टर्फ लाइनमुळे महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा येथे मुसळधार पावसाचा अलर्ट.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अरबी समुद्रात अजूनही कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मात्र त्याची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झालाय. अति मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुरस्थिती तीन दिवसांपासून निर्माण झाली होती. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानं अनेक भागांमधील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. हे सगळं असलं तरीसुद्धा 8 जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाचं टेन्शन अजूनही कायम आहे.
monsoon 2025
monsoon 2025
advertisement

अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत एक टर्फ लाइन गेल्यानं पावसाचा धोका कायम आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर 8 ते 10 जिल्ह्यांसाठी अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा आहे. बाकी उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. घराबाहेर पडण्याआधी तुमच्या जिल्ह्यातील हवामान कसं असेल जाणून घेऊया.

advertisement

कोणत्या 8 जिल्ह्यांसाठी अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा या जिल्ह्यांसाठी आज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या आणि परवा पुन्हा एकदा विदर्भात पाऊस जोर धरेल. 50 किमी ताशी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज विदर्भात पाऊस विश्रांती घेईल असा प्राथमिक अंदाज आहे.

advertisement

रायगड आणि रत्नागिरीसाठी पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बाप्पाचं आगमनही मुसळधार पावसातच करावं लागतंय की काय अशी परिस्थिती तळ कोकणात आहे. अति मुसळधार झालेल्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धरणं भरुन वाहात आहेत. सध्या उजनी धरण 105 टक्क्याहून अधिक भरलंय. उजनी धरणांमधून 16 दरवाज्यातून 1 लाख 50 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरु केला होता. त्यामुळे भीमा नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलं आहे.

advertisement

पुराची कुठे काय परिस्थिती?

गडचिरोली जिल्ह्यात तीन राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोमनपल्लीलगतच्या नाल्यावर इंद्रावती नदीच्या पुराचे पाणी आले. त्यामुळे महामार्ग बंद झाला आहे. कोट्यवधी रूपये खर्च करूनही हा मार्ग पाण्याखाली गेला आहे. नालासोपाऱ्या झालेल्या पावसामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये पाणी भरलेलं असतानाही अशाच परिस्थितीत पोलिसांना काम करावं लागतं. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे बारूळ गावातील बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. या पाण्यातूनच विद्यार्थी आणि ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करत आहेत. त्यामुळे आता या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आजचं हवामान: पावसाची आज विश्रांती पण 8 जिल्ह्यांचं टेन्शन कायम, हवामान विभागाने दिली अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल