अलमट्टीतून 1 लाख 40 हजार घनफूट विसर्ग
विशेष म्हणजे, दिवसभरात पंचगंगा नदीची पाणी पातळी पावणे दोन फुटांनी घटली आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. गुरुवारी दिवसभर तुरळक सरी कोसळल्या, तर शुक्रवारी सकाळपासून संततधार रिपरिप सुरू होती. पावसामुळे नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. तसेच, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळी आणखी कमी होण्यास मदत होत आहे. सध्या धरणात 1 लाख 49 हजार घनफूट प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे, तर 1 लाख 40 हजार घनफूट प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा आणि भुदरगड तालुक्यांमध्ये तुलनेने जास्त पाऊस झाला आहे.
advertisement
जिल्ह्यात 4 लाखांचे नुकसान
शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात 13 खासगी मालमत्तांची पडझड झाली, यात अंदाजे 3 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी, एसटीचे दोन मार्ग अजूनही बंद आहेत. शिरढोण ते कुरुंदवाड आणि जमखंडी ते कुडची या मार्गांवर एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रातील असं एक संस्थान, जिथे दिला जातो निराधारांना आधार, होतकरू मुलांनाही शिक्षणासाठी केली जाते मदत, Video
हे ही वाचा : Morning Habits : सकाळी उठून लगेच चहा पिताय? रिकाम्या पोटी चहा पिण्याने होईल नुकसान, डॉक्टरांनी दिला इशारा