TRENDING:

Sorry मुंबईकर...आरक्षणासाठी नाईलाजाने मुंबई पॅक केली, पण गावाकडे जाताना मराठ्यांनी मन जिंकलं

Last Updated:

 आंदोलकांनी देखील मुंबईकरांना जो त्रास झाला त्याबद्दल सॉरी मुंबई म्हणत जाहीर माफी मागितली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जिंकलो रे.. जरांगेंनी विजयी गुलाल उधळला अन् आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष सुरू केला. मागण्या मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. अखेर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातला शासन निर्णय काढण्यात आला...त्यामुळे मराठा आंदोलकांनी मुंबईत जोरदार सेलिब्रेशन सुरू केलं. गेली पाच दिवस मराछा आंदोलनामुळे मुंबईकरांना वेठीस ठेवले होते. आंदोलकांमुळे मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगेंनी सर्वांचे आभार मानले.   आंदोलकांनी देखील मुंबईकरांना जो त्रास झाला त्याबद्दल सॉरी मुंबई म्हणत जाहीर माफी मागितली.
News18
News18
advertisement

आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून उपोषणावर बसलेल्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळला आहे. जरांगेंनी विजयाची घोषणा केल्यानंतर आझाद मैदान एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी दुमदुमलं. राज्यपालांच्या स्वाक्षरीनं हैदराबाद गॅझेटियरच्या अमंलबजावणीचा शासन निर्णय सरकारने काढला त्याचसोबत त्यांच्या इतर मागण्याही मान्य झाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं... त्याचसोबत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ तर सातारा संस्थानचं गॅझेटियर लागू करण्यासाठी 1 महिन्यांची मुदत त्यांनी दिली आहे.

advertisement

लोकल रेल्वेच्या मार्गात अडथळा

मराठा आरक्षणासाठी असंख्य मराठा आंदोलकांनी विशेष करून दक्षिण मुंबईतील रस्ते,

शिवाजी छत्रपती महाराज स्थानक, मंत्रालय, हुतात्मा चौक परिसरातील रस्त्यांवरच ठिय्या मांडला.

परिणामी वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं मुंबईकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म तर घरच बनवले. जेवणासाठी, रात्री झोपण्यासाठी आणि जल्लोष करण्यासाठी सीएसएमटी स्थानक हे केंद्र झालं होतं. गोंधळ घालून लोकल रेल्वेच्या मार्गात अडथळा आणणं, त्यामुळे गर्दीच्या वेळेला लोकल खोळबंल्या होत्या.

advertisement

बसच्या टपावर चढून केली जोरदार निदर्शने

एवढच नाही तर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या बेस्ट बसच्या टपावर चढून काही आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. अखेर आज मागण्या पूर्ण झाल्यानंतर आंदोलकांनी त्याच सीएमटी स्थानकावर मुंबईकरांची माफी मागितली आणि आपल्या गावाकडे रवाना झाले.

राज्य सरकारनं जरांगे पाटलांचं म्हणणं मान्य केलं

advertisement

मराठा आरक्षण उपसमितीनं तयार केलेल्या मसुद्याप्रमाणे राज्य सरकारनं जीआर काढलाय. जरांगेंनी या मसुद्याला मान्यता दिली होती. हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याची मागणी जरांगे पाटलांनी मागील दोन वर्षांपासून सातत्यानं केली होती. मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर हाच एकमेव पर्याय असल्याचं जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं होतं. अखेर राज्य सरकारनं जरांगे पाटलांचं म्हणणं मान्य केलंय.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sorry मुंबईकर...आरक्षणासाठी नाईलाजाने मुंबई पॅक केली, पण गावाकडे जाताना मराठ्यांनी मन जिंकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल