मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी ठाण मांडून बसलेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची जरांगेची आग्रही मागणी आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजही आपल्या आरक्षणात कुणी वाटेकरी नको यासाठी आक्रमक झालाय. मुंबईतल्या जरांगेच्या आंदोलनाला उत्तर म्हणून नागपुरात शनिवारपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात झालीये.
बबनराव तायवाडेंच्या अध्यक्षतेत सुरु असलेल्या या आंदोलनात पहिल्याच दिवशी सर्वपक्षीय नेते सहभागी झाले काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान, माजी आमदार अशोक धवड, अपक्ष भाजपचे आमदार परिणय फुके, आशिष देशमुख, माजी आमदार सुधाकर देशमुख, रमेश शिंगारे यांनी या उपोषण स्थळाला भेट देत आपले समर्थन दिले.
advertisement
ओबीसीच्या आरक्षणाला जर सरकारने धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर साखळी उपोषणाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशाराही ओबीसी महासंघाने दिलाय. सोबतच मुंबईत मोठ्या संख्येने कूच करत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची भूमिका घेतलीये.
ओबीसीच्या आरक्षणाला जर सरकारने धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात करण्याचा इशाराही ओबीसी महासंघाने दिलाय. सोबतच मुंबईत मोठ्या संख्येने कूच करत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तोडीस तोड उत्तर देण्याची भूमिका घेतलीये.
जरांगे पाटलांचं आंदोलन आणि ओबीसी बांधवांचा आक्रमक पवित्रा यामुळे राज्य सरकार कात्रीत सापडलं आहे. यावर तोडगा काढताना सरकारची कसोटी लागणार आहे. आता या दोन्ही समाजांना नाराज न करता त्यांच्या अपेक्षांची पूर्ती सरकार कसं करणार, ही तारेवरची कसरत कशी साधणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.