TRENDING:

Dombivli: उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ भागात वीज पुरवठा खंडीत, महावितरणने सांगितलं वीज कधी येणार

Last Updated:

 उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दिवसभरापासून अनेक भागांमध्ये बत्ती गुल झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : कल्याण आणि शेजारी परिसरामध्ये पावसामुळे वीज जाण्याचे प्रकार नवीन नाही. पण आता  महापारेषणच्या पडघा वीज वाहिनीत बिघाड झाला आहे. त्यामुळे उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ भागातील ९५ हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा प्रभावीत झाला आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा हा खंडीत झाला आहे.  महापारेषणकडून युद्ध पातळीवर दुरूस्तीचे काम सुरू आहे.  दुरुस्तीसाठी आणखी ४ ते ५ तास लागणार असल्याची माहिती  महावितरणने दिली आहे.
News18
News18
advertisement

उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दिवसभरापासून अनेक भागांमध्ये बत्ती गुल झाली आहे.  महापारेषणची पडघा वीज वाहिनीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. पडघा वीज वाहिनी ही मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या पडघा येथील उपकेंद्रातून ही वाहिनी सुरू होते. पडघा उपकेंद्र हे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. अनेकदा मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा आणि खारघर येथील वीज वाहिन्यांशी ती जोडलेली आहे.

advertisement

मागे काही दिवसांपूर्वी पडघा इथं वीज वाहिनीत बिघाड झाला होता.  जेव्हा पडघा येथील वीज वाहिनी किंवा उपकेंद्रामध्ये तांत्रिक बिघाड होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) अनेक भागांवर होतो. यामुळे मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या काही वर्षांत अनेकदा पडघा-कळवा किंवा पडघा-पाल (मानपाडा) या २२० केव्ही अतिउच्चदाब वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरसारख्या शहरांमध्ये मोठा वीजपुरवठा खंडित झाला होता. आता पुन्हा एकदा बिघाड झाल्यामुळे उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dombivli: उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ भागात वीज पुरवठा खंडीत, महावितरणने सांगितलं वीज कधी येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल