शिवसेना उबीटी (Shiv Sena UBT) चे खासदार संजय राऊत दसरा मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यातून बोलता त्यांनी संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
संजय राऊत म्हणाले, भर पावसामध्ये चिखलामध्ये हजर असलेले निष्ठावंत शिवसैनिक,68 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी जी ठिणगी टाकली आहे,तो मुसळधार पाऊस सुद्धा विझवू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. त्याचसोबत मराठवाडा ८ दिवस पाण्यात आहे, आता आपल्याला 2 तास पाण्यात मेळावा घ्यावा लागला आहे, त्यामुळे हा आपला ओला मेळावा आहे, असा टोला देखील संजय राऊत यांनी महायुती सरकारला लगावला.
advertisement
गद्दारांच्या मेळाव्यात शस्त्र पूजन करण्याची गरज नाही.कारण मला कळलं दिल्लीतून अमित शाह यांचे जोडे आणि चपला आणल्या आहेत.त्यामुळे ते अमित शाह यांच्या जोड्यांची पूजा करतील, आम्ही शस्त्रांची पूजा करतोय, असा चिमटा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना काढला.तसेच हे सरकार मत चोरीतून आलं आहे. लोकसभेला चोरी, विधानसभेला चोरी, शिवसेनेची चोरी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चोरी. आता मुंबईतील चोर बाजाराचं नाव मोदी बाजार केलं पाहिजे, असे देखील राऊत म्हणाले.
आपल्याला रावणाचा दहन करायचा आहे. रावनाला आता पावसात बुडवायचा की जाळायचा याचा विचार करावा लागणार आहे. दिल्लीतला रावण आपल्याला जाळावा लागणार आहे,अशी टीका देखील संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप नेत्यावर केली.