गेल्या 28 वर्षांपासून संस्कार भारतीच्या वतीने सकाळी सहा वाजल्यापासून हिरेहब्बू वाड्यापासून ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत रांगोळी काढण्यात येते. जवळपास 3 किलोमीटरपर्यंत ही रांगोळी काढण्यात येते. साधारणतः संस्कार भारतीचे 150 हून अधिक सदस्य या रांगोळी साकारण्यासाठी मेहनत घेत असतात. या रांगोळ्या साकारण्यासाठी जवळपास 1 हजार किलो रंग आणि 50 पोते रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी काढण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासह पुणे, तुळजापूर, कोल्हापूर, या ठिकाणाहून तरुण-तरुणी आले आहेत.
advertisement
संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video
संस्कार भारतीच्या वतीने काढण्यात आलेल्या रांगोळीच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाच्या वर्षी मतदानाचा हक्क बजावणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, शिक्षणाचे महत्त्व आदी संदेश देण्याचा प्रयत्न या रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.





