दहावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील अनिश्चितता पाहून बाळासाहेबांनी स्वतःचा मार्ग निवडण्याचे ठरवले. सुमारे 15 वर्षांपूर्वी त्यांनी केवळ दोन गायींपासून आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यांनी हार मानली नाही. सातत्यपूर्ण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज त्यांच्या गोठ्यात तब्बल 40 गाई आहे.
Youtube वर video पाहुन केली शेती, शिक्षकाचा टरबूज-खरबुज प्रयोग यशस्वी, इतक्या लाखांचा नफा
advertisement
गायींपासून दररोज सकाळ आणि संध्याकाळ मिळून सुमारे 200 लिटर दुधाचे उत्पादन होते. तीन महिन्यांनी पशुवैद्यकांना गोठ्यावर बोलावून गायींची तपासणी केली जाते. तसेच आवश्यक लसीकरणही केले जाते. गायींना दिवसातून दोन वेळा चारा आणि योग्य खुराक दिला जातो. गोठ्याची नियमित स्वच्छता आणि जनावरांची विशेष काळजी घेतली जाते.
या व्यवसायासाठी दरमहा चारा आणि खुराकावर सुमारे एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र दूध विक्रीतून होणाऱ्या उत्पन्नातून सर्व खर्च वजा करून त्यांना महिन्याला सुमारे एक लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो, असे बाळासाहेब सांगतात.
देशात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय उभा करावा, असे आवाहन रणदिवे करतात. शेती असेल तर शेती करावी, अन्यथा छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करून मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, असा प्रेरणादायी संदेश ते तरुणांना देत आहेत.





