काय चूक होते?
तुम्ही कोणतीही वस्तू हप्त्यांवर खरेदी केली असेल, तर त्याची EMI तारीख अशी असावी की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे राहतील. एकही EMI चुकल्यास, केवळ तुम्हाला दंडच नाही तर तुमच्या CIBIL स्कोअरवरही परिणाम होईल. याशिवाय भविष्यात तुम्ही इतर कोणतेही कर्ज घेण्यासाठी जाल, तेव्हा त्याचा परिणाम त्यावरही दिसून येईल. यामुळेच लोकांना सांगितले जाते की, जेव्हा ते कोणतीही वस्तू खरेदी करतात तेव्हा त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे की तुमचा पगार आल्यावर EMI तारीख सारखीच असावी.
advertisement
महाग होतंय सोनं, पोर्टफोलियोमध्ये सोनं असणं फायदेशीर? जाणून घ्या 5 कारणं
म्हणजे, तुमचा पगार 1 ते 5 तारखेच्या दरम्यान आला, तर तुम्ही तुमचा EMI पगाराच्या तारखेनंतर तीन किंवा चार दिवसांनी ठेवावा. याचा फायदा असा होईल की पगार एक-दोन दिवस उशिरा आला तरी तुमचा ईएमआय लॅप होणार नाही. त्याच वेळी, जर तुम्ही पगाराच्या तारखेपेक्षा ईएमआयची तारीख पुढे ढकलली, तर तुमच्या खात्यातील पैसे संपण्याची आणि तुमचा इएमआय लॅप्स होण्याचा धोका वाढतो.
EMI लॅप्स झाल्यास काय होईल?
तुमचा कोणताही EMI चुकल्यास किती नुकसान होऊ शकते हे आम्ही तुम्हाला उदाहरणासह समजावून सांगू. ईटी ब्युरोच्या रिपोर्टनुसार, अलीकडेच एका व्यक्तीने त्याच्या होम लोनचा ईएमआय भरण्यास एक दिवस उशीर केला. असे केल्याने, त्याच्या होम लोनचा आणि टॉप-अप कर्जाचा CIBIL स्कोर 799 वरून 772 पर्यंत कमी झाला. याशिवाय, व्यक्तीचा एक्सपेरियन स्कोअर देखील 10 गुणांनी कमी झाला.
Saving Account मध्ये किती पैसे ठेवता येतात? RBI चा नियम काय?
व्याजावरही परिणाम होतो
तुम्ही तुमचा EMI वेळेवर भरला नाही आणि तुमचा CIBIL स्कोअर घसरला तर त्याचा तुमच्या आगामी कर्जावरील व्याजावरही परिणाम होतो. अशा प्रकारे समजून घ्या, जर तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होमलोन टॉप-अप घ्यायचे असेल आणि तुमचा CIBIL स्कोर 750 पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला 9.10 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. तसंच, तुमचा कोणताही EMI चुकला किंवा तुम्ही तो उशीरा भरला आणि त्यामुळे तुमचा CIBIL स्कोर 750 पेक्षा कमी झाला, तर तुम्हाला 9.30 टक्के व्याजदराने तेच गृहकर्ज टॉप-अप मिळेल.