मुंबईत वीज वितरणाचे जाळे नसल्याने वीज पुरवठा करण्यासाठी पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत. महावितरणपुढे याच पायाभूत सोयी-सुविधा उभारण्याचं आव्हान असणार आहे. वीज नियामक आयोगाने वीजदर निश्चितीच्या प्रस्तावावर निर्णय देताना वीज दर कपातीचे आदेश दिले. याबाबत महावितरणच्या मुख्यालयात अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली.
Konkan Ro Ro: गणेशोत्सवाचा मुहूर्त हुकणार! कोकण रोरो सेवेबाबत महत्त्वाचं अपडेट
advertisement
एकाच दराने वीज
राज्यात आणि मुंबईत महावितरणच्या विजेचे दर समान असणार आहेत. राज्यात एका दराने वीज आणि मुंबई दुसऱ्या दराने असे होणार नाही. मुंबईसाठी स्वतंत्र कंपनी नसेल. तरीही येथील वीज कंपन्यांचे ग्राहक आपल्याकडे वळते करण्याचे आव्हान असणार असल्याचे चंद्र यांनी सांगितले.
या क्षेत्रांसाठी मागितली परवानगी
सध्या मुंबईच्या पूर्व उपनगरात भांडूप आणि मुलुंड परिसरात महावितरण विजेचा पुरवठा करत आहे. आता महावितरणने कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरांतील वांद्रे ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखुर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा-भाईंदर क्षेत्रात परवाना मिळावा, अशी मागणी आयोगाकडे केली आहे. आता उर्वरित शहर आणि परिसरात महावितरण वीज वितरणाच्या तयारीत आहे. त्यामुळे चार कंपन्यांत स्पर्धा होणार आहे.