2000 घरांची सोडत
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अखत्यारितील विक्रीवाचून रिक्त घरांची नव्याने लॉटरी काढण्यात येणार आहे. 2000 घरांच्या सोडतीसाठी तयारी सुरू असून ऑगस्टमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे ही घरे मुंबई जवळ ठाणे, कल्याण, शीळ, विरार परिसरात असून सर्वसामान्यांचं हक्काचं घर खरेदीचं स्वप्न साकार होणार आहे.
Hira Mavashi: रायगडची हिरकणी गेली! 80 वर्षाच्या हिरा मावशीचं निधन, शिवभक्त हळहळले!
advertisement
बुक माय होम योजना
दरम्यान, कोकण मंडळातील विरार- बोळींज, खोणी, शिरढोणसह अन्य ठिकाणच्या घरांची काही कारणांमुळे विक्री झाली नव्हती. त्यामुळे आता या घरांची विक्री 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजनेअंतर्गत आणि ‘बुक माय होम’ संकल्पनेनुसार केली जात आहे. 'बुक माय होम' योजनेस 30 एप्रिलपासून सुरुवात झाली असून हक्काचं घर घेण्यासाठी ही संकल्पना फायद्याची ठरत आहे.