मुंबईत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणात थंडीचा कडाका वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या गारव्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
मराठवाड्यात थंडीचा जोर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण, पाहा हवामान अपडेट
मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या उपनगरांमध्ये सुद्धा तीन दिवसात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.
advertisement
आज मुंबईचे किमान तापमान 21 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस असेल. दरम्यान हवेची आर्द्रतेची पातळी 40 टक्के राहील
कोल्हापूर ते पुणे थंडीचा कडाका वाढला, पश्चिम महाराष्ट्रातील आजचा हवामान अंदाज काय?
कोकणात काही ठिकाणी थंडीसह ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. येत्या काही दिवसात कोकणात थंडीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात घट झालेली पाहायला मिळत आहे.