पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाचे आकडे गेल्या निवडणुकीच्या आकड्यांशी तुलना केल्यास भाजपच्या जागांमध्ये घट होणार आहे. तर काँग्रेस पक्षाच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचं या पोल्समध्ये सांगण्यात आलं आहे. असं असलं तरी सत्तेच्या चाव्या मात्र भाजपकडे कायम राहणार आहेत. एकूण 243 सदस्य संख्या असलेल्या बिहार विधानसभेमध्ये सत्ता स्थापण करण्यासाठी एकूण 122 जागांची गरज आहे. मात्र दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात काहीसे चित्र वेगळे दिसत आहे.
advertisement
दुसऱ्या टप्प्यात काय चित्र पाहायला मिळालं?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही एनडीए आघाडी घेत असल्याचं चित्र दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, एनडीएला 140 ते 150 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2020 च्या तुलनेत या वेळी एनडीएचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जेडीयू सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल अशी शक्यता आहे. पक्षाला 60 ते 70 जागा मिळू शकतात, जो 2020 मध्ये मिळालेल्या 43 जागांच्या तुलनेत मोठी वाढ ठरणार आहे. भाजपला 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज असून, हा आकडा 2020 च्या तुलनेत किंचित कमी आहे.
एनडीएच्या मित्रपक्षांपैकी एलजेपी, एचएएमएस आणि आरएलएम हेही काही महत्त्वाच्या जागा जिंकत आघाडीला स्थिर बहुमत देण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, महागठबंधनला (एमजीबी) 85 ते 95 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो 2020 मध्ये मिळालेल्या 110 जागांच्या तुलनेत कमी आहे. आरजेडीला या वेळी 50 ते 60 जागा मिळू शकतात, जे 2020 मधील 75 जागांपेक्षा लक्षणीय घट आहे. काँग्रेसचा आकडा मात्र जवळपास तसाच राहण्याची शक्यता असून, पक्षाला 15 ते 20 जागा मिळू शकतात. तर जेएसपीला 0 ते 5 जागांपर्यंत मर्यादित यश मिळण्याचा अंदाज आहे.
News18 मेगा एक्झिट पोल काय सांगतो?
युती | जागा |
| NDA | 140 |
| MGB | 85-95 |
| JSP | 0-5 |
| others | 5-10 |
पहिल्या टप्प्यासाठी 64.66 टक्के मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यासाठीही चुरशीनं मतदान झाल्याचं दिसून आलं.दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांसाठी घेण्यात आलं. बिहार निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 122 जागांसाठी 1,302 उमेदवार रिंगणात होते. बिहार निवडणुकीची मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे.
त्यामुळे बिहारच्या सत्तेची चावी राष्ट्रीय जनता दल प्रणित महागठबंधनकडे जाणार की भाजप-जदयू सत्ता कायम ठेवणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
बिहार निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुका आगामी अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात. त्यामुळे बिहारची जनता कोणाला कौल देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
