एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहे. 243 जागांसाठी १२२ जागांसाठी बहुमताचा आकडा गाठवा लागणार आहे. MATRIZE- IEANS चे आकडे समोर आले आहे. यामध्ये बिहारमध्ये पुन्हा एकदा NDA सरकार बनणार असा अंदाज वर्तवला आहे. MATRIZE- IEANS च्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला ४८ टक्के तर इंडिया आघाडीला ३७ टक्के मतं मिळणार आहे. एनडीएच्या १४७ ते १६७ जागा येतील तर इंडिया आघाडीला ७० ते ९० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
NDA आणि इंडिया आघाडीमध्ये काँटे की टक्कर
बिहारमध्ये या वेळी पहिल्या टप्प्यात विक्रमी 64.66 टक्के मतदान झालं. मंगळवारी झालेल्या मतदानात 67.14 टक्के मतदानाची नोंद झाली, जे राज्याच्या इतिहासात सर्वात जास्त मतदान आहे. त्यामुळेच हे विक्रमी मतदान हे चांगल्या किंवा आश्चर्यकारक निकालाचे संकेत देत आहे.
बिहार निवडणुकीत यावेळी एनडीए (NDA) आणि महागठबंधन यांच्यात कांटे की टक्कर आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण 3.7 कोटी पेक्षा जास्त मतदारांनी 1302 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद केलं आहे. या टप्प्यात एनडीएने 122 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते . ज्यात भाजप (BJP) चे 53 आणि जेडीयू (JDU) चे 44 उमेदवारांचा समावेश आहे.. दुसरीकडे, इंडिया आघाडीकडून आरजेडी (RJD) चे 71 आणि काँग्रेस (Congress) चे 37 उमेदवारांसह एकूण 127 उमेदवार रिंगणात आहेत. आता बिहार निवडणुकीची मतमोजणी ही 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे, तेव्हाच चित्र स्पष्ट होईल.
