शिस्तीच्या नावाखाली बंदी
विद्यार्थिनी एकसारखी टिकली लावत नाहीत, त्यामुळे शाळेची शिस्त बिघडत आहे, असे कारण देत विद्यालय व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला होता. विद्यार्थिनींनी घरी जाऊन पालकांना याबद्दल सांगितले. त्यानंतर, संतप्त पालक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शाळेत एकत्र जमले.
शाळेत मोठा गोंधळ
शाळेमध्ये सुमारे पाऊण तास गोंधळ सुरू होता. पालक आणि कार्यकर्त्यांनी 'हिंदुत्ववादी परंपरा आणि संस्कृती जपण्यास कोणीही मनाई करू शकत नाही,' असे ठणकावून सांगितले. त्यांनी मुख्याध्यापकांवर या निर्णयाचा निषेध करत, तो तात्काळ मागे घेण्याची मागणी केली. अखेर, वाढता विरोध पाहता मुख्याध्यापकांनी टिकली न लावण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
advertisement
हे ही वाचा : Lightning Strike Temple: वीज कडाडली अन् देवस्थानात कहर, मंदिराच्या कळासाला तडे, उपकरणांचे नुकसान
हे ही वाचा : पुण्यात जाताय? आधी 'हे' वाचा! पंचगंगेवरील पूल राहणार बंद, वाहतूक कोंडी वाढणार, वापरा 'हे' 2 पर्यायी मार्ग!