TRENDING:

Exit Poll Sanjay Raut : मतदानानंतर संजय राऊतांचा एक्झिट पोल, जागांचा आकडाही सांगितला अन् मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य

Last Updated:

Maharashtra Elections Sanjay Raut : एक्झिट पोलची चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपला एक्झिट पोल सांगितला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  जवळपास महिनाभर सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा खाली बसला आहे. बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर आता विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले. यातील बहुतांशी एक्झिट पोलनुसार, राज्यात महायुती सत्तेत पुनरागमन करत आहे. तर, काही मोजक्याच एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे. एक्झिट पोलची चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपला एक्झिट पोल सांगितला आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut
advertisement

शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्यांवर भाष्य केले. राऊत यांनी म्हटले की, लोकसभेला 400 पारची घोषणा देण्यात आली होती. पण, त्याचे निवडणुकीत काय झाले हे आपण पाहिले आहे. लोकांनी गुप्त पद्धतीने मतदान केले आहे. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटले पण महाराष्ट्राचा स्वाभिमान असणार असल्याचे त्यांनी म्हटले. जनतेने महाराष्ट्रासाठी मतदान केले असल्याचे राऊत यांनी म्हटले.

advertisement

संजय राऊत यांचा एक्झिट पोल काय?

खासदार संजय राऊत यांनी एक्झिट पोलबाबत बोलताना सांगितले की, एक्झिट पोल हा फ्रॉड आहे. हरियाणामध्ये काँग्रेस 60 च्या वर जागांवर विजयी होईल असे सांगण्यात आले. पण, त्याचे काय झाले असा सवाल त्यांनी केला. राज्यात महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्यावतीने 23 नोव्हेंबर रोजी सत्तेवर दावा करणार आहोत. तर, 26 नोव्हेंबर रोजीच सत्ता स्थापन करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

advertisement

मविआच्या सरकारचे मुख्यमंत्री कोण?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज आणि उद्या बैठक असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाबाबत एकत्र बसून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदावर केलेल्या दाव्यावर त्यांनी म्हटले की, नाना पटोले हे नेतृत्व करणार असतील तर त्यांच्या नावाची घोषणा काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी करायला हवी असा टोलाही त्यांनी लगावला.

advertisement

इतर महत्त्वाची बातमी :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

Maharashtra Voting Pattern : तीन दशकानंतर सर्वाधिक मतदान, महायुती-महाविकास आघाडीत धाकधूक! 'या' फॅक्टरने गणितं बदलली?

मराठी बातम्या/ बातम्या/महाराष्ट्र/
Exit Poll Sanjay Raut : मतदानानंतर संजय राऊतांचा एक्झिट पोल, जागांचा आकडाही सांगितला अन् मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल