तुमच्या 6 सवयी देवी लक्ष्मीला करतात नाराज, झटक्यात खाली होते भरलेली तिजोरी; आजच बंद करा 'ही' कामं
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन, वैभव आणि समृद्धीची अधिष्ठात्री देवता मानले जाते. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहावी. मात्र, अनेकदा आपण नकळत अशा काही गोष्टी किंवा सवयी पाळतो, ज्यामुळे लक्ष्मी देवी रुष्ट होते.
advertisement
1/7

हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धन, वैभव आणि समृद्धीची अधिष्ठात्री देवता मानले जाते. प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहावी. मात्र, अनेकदा आपण नकळत अशा काही गोष्टी किंवा सवयी पाळतो, ज्यामुळे लक्ष्मी देवी रुष्ट होते. ज्योतिषशास्त्र आणि पुराणांनुसार, ज्या घरात अस्वच्छता, कलह आणि बेशिस्त असते, तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही.
advertisement
2/7
सूर्यास्ताच्या वेळी झोपणे : शास्त्रांनुसार सूर्यास्ताचा काळ हा देवी-देवतांच्या आगमनाचा काळ मानला जातो. या वेळी घरात दिवा लावून प्रार्थना करणे अपेक्षित असते. जे लोक या वेळी झोपून राहतात, त्यांच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी देवी अशा घराचा त्याग करते.
advertisement
3/7
उष्टी भांडी रात्रभर ठेवणे : अनेक घरांमध्ये रात्रीची उष्टी भांडी तशीच सिंकमध्ये ठेवली जातात आणि सकाळी घासली जातात. ही सवय अत्यंत अशुभ मानली जाते. उष्टी भांडी दरिद्रतेला आमंत्रण देतात, त्यामुळे रात्रीच स्वयंपाकघर स्वच्छ करून झोपणे श्रेयस्कर ठरते.
advertisement
4/7
अन्नाचा अपमान करणे : अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ताटात अन्न उष्टे सोडणे किंवा अन्नाचा अपमान करणे म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचा अपमान करणे होय. ज्या घरात अन्नाची नासाडी होते, तिथे अन्नाचा तुटवडा आणि आर्थिक चणचण भासते.
advertisement
5/7
घरातील कटकट आणि भांडणे : 'जिथे शांतता, तिथे लक्ष्मी' हे सूत्र कायम लक्षात ठेवावे. ज्या घरात पती-पत्नीमध्ये सतत वाद होतात किंवा मोठ्यांचा अनादर केला जातो, तिथून लक्ष्मी निघून जाते. घरातील क्लेश सकारात्मक ऊर्जेला नष्ट करतात.
advertisement
6/7
स्त्रियांचा अनादर करणे : शास्त्रात स्त्रियांना 'गृहलक्ष्मी' मानले गेले आहे. ज्या घरात आई, पत्नी, बहीण किंवा कोणत्याही स्त्रीचा अपमान होतो किंवा त्यांना त्रास दिला जातो, तिथे लक्ष्मी देवी कधीही प्रसन्न होत नाही. स्त्रियांचा सन्मान हेच समृद्धीचे लक्षण आहे.
advertisement
7/7
मुख्य प्रवेशद्वारापाशी अस्वच्छता: घराचे मुख्य द्वार हे लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान असते. जर प्रवेशद्वारासमोर कचरा, चपलांचा ढीग किंवा अस्वच्छता असेल, तर माता लक्ष्मी दारातूनच परत फिरते. त्यामुळे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि सुशोभित ठेवावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
तुमच्या 6 सवयी देवी लक्ष्मीला करतात नाराज, झटक्यात खाली होते भरलेली तिजोरी; आजच बंद करा 'ही' कामं