Dhurandhar ला घाबरला अमिताभ बच्चन यांचा नातू, घेतली माघार, काय आहे कारण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan Grandson Agastya Nanda : अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा Dhurandhar या चित्रपटाला घाबरलेला पाहायला मिळत आहे.
advertisement
1/7

रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना स्टार 'धुरंधर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. रिलीजच्या 16 दिवसांत या सिनेमाने 516.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'धुरंधर' या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरू शकते. 'धुरंधर'मुळे इतर चित्रपटांना फटका बसलेलं पाहायला मिळत आहे.
advertisement
2/7
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) याची 'इक्कीस' (Ikkiss) ही फिल्म 25 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होती. अगस्त्य नंदा या सिनेमात मुख्य भूमिकेत होता. पण आता रिलीजच्या काही दिवस आधीच या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
advertisement
3/7
अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाच्या 'धुरंधर'ला घाबरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कारण 'धुरंधर'चा जगभरातील थिएटरमध्ये असलेला बोलबाला पाहून 'इक्कीस'च्या रिलीजला ब्रेक लागला आहे.
advertisement
4/7
धर्मेंद्र आणि अगस्त्य नंदा यांची 'इक्कीस' ही फिल्म आता 1 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिसवरील यश हे या चित्रपटाचं रिलीज डेट पुढे ढकलण्याचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
5/7
PTI ला दिलेल्या मुलाखतीत 'इक्कीस'चे निर्माते दिनेश विजन सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याबाबत म्हणाले,"मला वाटतं कधीकधी सर्वांच्या भल्याचा निर्णय घ्यायला हवा. कारण यामुळे तुमचाच फायदा होणार असतो. 'इक्कीस' ही फिल्म शांततेत रिलीज व्हायला पाहिजे. आम्हाला वर्षाच्या सुरुवातीचा दिवस मिळाला आहे हे खरंतर आमचं नशीब आहे. 'छावा' आणि 'पुष्पा'सोबत हे घडलं होतं. बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येण्यापेक्षा हा निर्णय योग्य ठरेल".
advertisement
6/7
'इक्कीस' 25 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला असता तर या चित्रपटाला कार्तिक आर्यन-अनन्या पांडेच्या 'तू मेरा मैं तेरी, मैं तेरा तू मेरी', जेम्स कॅमेरुनच्या 'अवतार फायर अँड अॅश' या चित्रपटांसोबत सामना करावा लागला असता.
advertisement
7/7
'इक्कीस' ही फिल्म परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांच्या आयुष्यावर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू प्रमुख भूमिकेत असलेला हा पहिला सिनेमा आहे. या चित्रपटात दिवंगत अभिनेते धर्मेंद्रदेखील झळकणार आहेत. धर्मेंद्र यांचा हा शेवटचा सिनेमा होता. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या फिल्मची प्रतीक्षा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar ला घाबरला अमिताभ बच्चन यांचा नातू, घेतली माघार, काय आहे कारण?