सलमान-अरबाज करतात एकमेकांचा तिरस्कार? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा भयानक खुलासा, म्हणाले 'एकमेकांना भांडी फेकून मारली...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood controversy : प्रसिद्ध दिग्दर्शकाचा दावा आहे की, सलमान आणि अरबाज खान या दोन सख्ख्या भावांमध्ये अजिबात पटत नाही आणि ते एकमेकांचा तिरस्कार करतात.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडमध्ये 'दबंग' चित्रपटामुळे ओळखले जाणारे दिग्दर्शक अभिनव कश्यप आणि सुपरस्टार सलमान खान यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत.
advertisement
2/8
अभिनव कश्यप यांनी पुन्हा एकदा सलमान खान आणि आता त्याचा भाऊ अरबाज खान यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. अभिनव कश्यप यांचा दावा आहे की, सलमान आणि अरबाज खान या दोन सख्ख्या भावांमध्ये अजिबात पटत नाही आणि ते एकमेकांचा तिरस्कार करतात.
advertisement
3/8
अभिनव कश्यप यांनी २०१० मध्ये आलेल्या आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'दबंग' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर 'दबंग २' चे दिग्दर्शन अरबाज खानने केले, तर तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन प्रभू देवाने केले. 'दबंग' नंतर अभिनव कश्यप यांनी सलमानवर अनेक गंभीर आरोप केले होते.
advertisement
4/8
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनव कश्यप यांनी खान कुटुंबावर निशाणा साधला आहे. त्यांनी दावा केला की, सलमान खान यांनी एकदा अरबाज खानवर चक्क भांडी फेकून मारले होते.
advertisement
5/8
'बॉलिवूड ठिकाणा'ला दिलेल्या मुलाखतीत कश्यप यांनी सलमानच्या स्वभावावर भाष्य केले. ते म्हणाले, "सलमान खान रात्री दीड वाजता माझ्या रूममध्ये यायचा. खरं तर, चित्रपटात अरबाज खानचा एक दमदार पाठलाग करणारा सीन होता, पण सलमानने तो हटवला. सलमान खान खूप असुरक्षित व्यक्ती आहे. त्याला फक्त लोकांच्या नजरेत राहायचे असते."
advertisement
6/8
या दोन भावांच्या नात्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "हे दोघे भाऊ एकमेकांचा तिरस्कार करतात. ते सोबत कसे राहतात, हे मला कळत नाही. या कुटुंबाला समजून घेणे खूप कठीण आहे."
advertisement
7/8
अभिनव कश्यप यांनी त्यांच्या डोळ्यासमोर घडलेला एक थरारक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "मला खात्री आहे की अरबाजने सलमानला त्याच्या कट केलेल्या भूमिकेबद्दल नक्कीच विचारले असेल, पण माझ्यासमोर त्यांनी भांडण केले नाही. मात्र, एकदा माझ्यासमोरच अरबाज आणि सलमान यांचे भांडण झाले, तेव्हा सलमानने त्याला तिथे असलेली भांडी फेकून मारले होते! हे पाहून मी खूप घाबरलो होतो."
advertisement
8/8
कश्यप यांनी त्या दिवशी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सलमानने त्यांना दूर राहण्यास सांगितले. याशिवाय, कश्यप यांनी असाही दावा केला की, सलमानला मलायका अरोराचे 'मुन्नी बदनाम हुई' हे आयटम साँग करायचे नव्हते, कारण तो अनकम्फर्टेबल होता आणि त्याला ते गाणे अश्लील वाटत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमान-अरबाज करतात एकमेकांचा तिरस्कार? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा भयानक खुलासा, म्हणाले 'एकमेकांना भांडी फेकून मारली...'