उपाशीपोटी पाण्यात घालून प्यावा 'हा' पदार्थ, बर्फासारखी वितळेल चरबी, वजन होईल कमी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपला संपूर्ण दिवस कसा जाणार हे आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर अवलंबून असतं. त्याचप्रमाणे सकाळी आपल्या पोटात काय जातं यावरून दिवसभर आपली पचनसंस्था कशी असणार हे ठरतं. याबाबत नेमकं काय फायदेशीर असतं, जाणून घेऊया. (अंजू प्रजापती, प्रतिनिधी)
advertisement
1/5

सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात तूप घालून प्यायल्यास थकवा क्षणात दूर होतो. त्यामुळे दिवसभर शरीर ऊर्जावान राहतं. ग्लासभर पाण्यात चमचाभर तूप घालून व्यवस्थित मिसळून घ्यावं. सकाळी उठल्यानंतर किंवा ब्रश केल्यानंतर हळूहळू हे पाणी प्यावं. त्यानंतर 20-30 मिनिटं काहीच खाऊ नये. जेणेकरून तुपाच्या पाण्याचं पचन व्यवस्थित होईल.
advertisement
2/5
तुपामुळे पोटात चिकटपण निर्माण होतं, ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. परिणामी बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, इत्यादी त्रास होत नाही. तुपाच्या पाण्यामुळे शरीर डिटॉक्स होतं, रक्त शुद्ध होतं.
advertisement
3/5
तुपात ओमेगा-3 फॅटी ऍसिड असतं, ज्यामुळे हाडं भक्कम होण्यास मदत मिळते. तसंच सांधेदुखीवरही आराम मिळतो. तुपामुळे मेटाबॉलिज्म वाढतं, ज्यामुळे कॅलरी वेगाने बर्न होतात. परिणामी अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत मिळते आणि वजन नियंत्रित राहतं.
advertisement
4/5
ऍसिडिटी, पोट फुगणे, जळजळ, इत्यादी समस्यांवर आराम मिळतो. पचनसंस्था सुरळीत होते. तसंच त्वचेवर तेज येतं आणि केस भक्कम होतात.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उपाशीपोटी पाण्यात घालून प्यावा 'हा' पदार्थ, बर्फासारखी वितळेल चरबी, वजन होईल कमी!