Fridge : फ्रिज नसेल तरी भाजी ताजी कशी ठेवायची? आजीबाईंच्या 'या' ट्रिक्स आजही मॉर्डन सुनांसाठी कामाच्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Indian kitchen hacks for fresh veggies : पालेभाज्या तर आणल्या-आणल्याच कोलमडायला लागतात. मेथी असो वा कोथिंबीर, ती कोमेजलेली दिसली की आपल्यालाही वाईट वाटतं,
advertisement
1/9

स्वयंपाक घरात फ्रीज ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भाज्या ताज्या ठेवण्यासाठी आणि जेवण चांगलं ठेवण्यासाठी फ्रीज गृहिणींसाठी वरदानच आहे. यामध्ये दुध देखील खराब होत नाही फळ तसेच इतर पदार्थ ताजे राहातात. त्यामुळे गृहिणी स्वतः बाजारातून पिशवी भरून ताज्या, टवटवीत भाज्या आणतात. पण खरं टेन्शन तेव्हा येतं, जेव्हा आपल्याला कळतं की फ्रिजमध्ये आधीच डबे भरलेत किंवा ऐनवेळी फ्रिजने दगा दिलाय आणि त्याने भाज्या ताज्या ठेवणं बंद केलं आहे.
advertisement
2/9
पालेभाज्या तर आणल्या-आणल्याच कोलमडायला लागतात. मेथी असो वा कोथिंबीर, ती कोमेजलेली दिसली की आपल्यालाही वाईट वाटतं, शेवटी कष्टाचे पैसे आणि मेहनत असते त्यात. मग आपण काय करतो? ती कोमेजलेली भाजी कशीतरी शिजवतो, पण त्याची चव मात्र बिघडते. मग आता करायचं काय? असा प्रश्न गृहिणींना पडतो.
advertisement
3/9
आपल्या आई-आजीच्या काळात कुठे होते फ्रिज? तरीही त्यांच्या भाज्या किती छान राहायच्या, आठवतंय? आज आपण त्याच काही विसरलेल्या पण अगदी कामाच्या गावरान ट्रिक्स पाहणार आहोत, ज्या वापरून फ्रिजशिवायही तुमच्या भाज्या राहतील अगदी ताज्या.
advertisement
4/9
1. पालेभाज्यांसाठी पाणी संजीवनीमेथी, पालक किंवा कोथिंबीर आणली की आपण ती तशीच प्लास्टिकमध्ये ठेवतो, हीच मोठी चूक, मग काय कराल? एका भांड्यात थोडं पाणी घ्या आणि कोथिंबीर किंवा मेथीची जुडी (मुळं खाली राहतील अशा पद्धतीने) त्यात उभी करून ठेवा. जसं आपण फुलदाणीत फुलं ठेवतो ना, अगदी तसंच. फक्त लक्षात ठेवा, पानं पाण्यात बुडणार नाहीत, नाहीतर ती कुजतील. यामुळे दोन दिवस तरी भाजी अगदी टवटवीत राहते.
advertisement
5/9
2. मातीचं माठ किंवा डेरा वापराउन्हाळ्यात आपण पाणी थंड करण्यासाठी माठ वापरतो, पण तो भाज्यांसाठीही बेस्ट आहे.काय कराल? एक मोठं मातीचं भांडं (ज्याला छिद्र नसतील) घ्या, त्यात थोडी ओली वाळू किंवा ओला सुती कपडा खाली अंथरा आणि त्यावर भाज्या ठेवा. वरून पुन्हा ओल्या कपड्याने झाकून ठेवा. मातीच्या थंडाव्यामुळे भाज्या 4-5 दिवस अजिबात खराब होत नाहीत.
advertisement
6/9
3. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवताय? तर सावधानआपल्यापैकी अनेकजणी एकाच टोपलीत कांदे आणि बटाटे साठवतात. पण कांद्यातून बाहेर पडणाऱ्या एका विशिष्ट गॅसमुळे बटाटे लवकर सडतात किंवा त्यांना मोड येतात.काय कराल? कांदे आणि बटाटे नेहमी वेगवेगळ्या टोपलीत ठेवा. बटाट्यांच्या टोपलीत एखादं 'सफरचंद' ठेवलं, तर बटाटे जास्त काळ टिकतात, ही एक जुनी गुपित ट्रिक आहे.
advertisement
7/9
4. आले-मिरची आणि लिंबूमिरच्यांचे देठ काढून ठेवले तर त्या आठवडाभरही खराब होत नाहीत. लिंबं जर सुकायला लागली, तर ती एखाद्या काचेच्या बरणीत पाणी भरून त्यात बुडवून ठेवा. रोज पाणी बदललं की लिंबं महिनाभर रसरशीत राहतात.
advertisement
8/9
5. वांगी, कारली आणि भेंडीया भाज्या कधीही प्लास्टिकच्या पिशवीत गच्च भरून ठेवू नका. त्यांना हवा मिळणं गरजेचं असतं.काय कराल? सुती कापड किंवा जुनी गोणपाट (पोतं) थोडं ओलं करा आणि त्यात या भाज्या गुंडाळून थंड जागी ठेवा. फ्रिजसारखाच थंडावा मिळून भाज्या कडक राहतील.
advertisement
9/9
एक छोटीशी चूक टाळा...अनेकदा आपण भाज्या धुवून मग साठवतात. पण भाज्या साठवण्यापूर्वी त्या पूर्ण कोरड्या असणं खूप गरजेचं आहे. जर ओलसरपणात त्या ठेवल्या, तर त्यांना लगेच बुरशी लागते. त्यामुळे जेव्हा करायची असेल, तेव्हाच भाजी धुवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Fridge : फ्रिज नसेल तरी भाजी ताजी कशी ठेवायची? आजीबाईंच्या 'या' ट्रिक्स आजही मॉर्डन सुनांसाठी कामाच्या