TRENDING:

संंध्याकाळी तुळशीसमोर दिवा का लावला जातो? केवळ धर्मिक नाही, यामागे दडलंय मोठं शास्त्रीय कारण

Last Updated:
आजच्या 'मॉडर्न' काळात जेव्हा आपण या प्रथेचा अभ्यास करतो, तेव्हा त्यामागील नैसर्गिक आणि आरोग्यदायी कारणे पाहून थक्क व्हायला होते.
advertisement
1/9
सायंकाळी तुळशीसमोर दिवा का लावला जातो? केवळ धर्मिक नाही, तर दडलंय शास्त्रीय कारण
भारतीय संस्कृतीत तुळशीला 'वृंदा' किंवा 'विष्णूची प्रिया' मानून अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत तुळशीचं झाड असतेच. पिढ्यानपिढ्या आपण पाहत आलो आहोत की, सायंकाळ झाली की घरातील गृहिणी किंवा वडीलधारी माणसे तुळशीजवळ दिवा लावतात. आपण याकडे केवळ एक धार्मिक प्रथा किंवा श्रद्धा म्हणून पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या पूर्वजांनी ही परंपरा सुरू करण्यामागे एक अतिशय सखोल शास्त्रीय विचार केला होता.
advertisement
2/9
आजच्या 'मॉडर्न' काळात जेव्हा आपण या प्रथेचा अभ्यास करतो, तेव्हा त्यामागील नैसर्गिक आणि आरोग्यदायी कारणे पाहून थक्क व्हायला होते.
advertisement
3/9
शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर तुळस हे एक असे झाड आहे जे दिवसातील 24 Hours ऑक्सिजन उत्सर्जित करण्यासाठी ओळखले जाते. सायंकाळच्या वेळी, म्हणजे सूर्य मावळताना आणि रात्र सुरू होताना, हवेतील आर्द्रता (Humidity) वाढते आणि अनेक प्रकारचे सूक्ष्म कीटक, डास आणि बॅक्टेरिया सक्रिय होतात. तुळशीच्या झाडामध्ये नैसर्गिकरीत्या औषधी गुणधर्म असतात जे कीटकांना दूर ठेवतात. जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो, विशेषतः गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा, तेव्हा त्या उष्णतेमुळे तुळशीच्या पानांमधून विशिष्ट सुगंधी द्रव्ये (Volatile oils) हवेत पसरतात.
advertisement
4/9
हे मिश्रण नैसर्गिक 'डिइन्फेक्टंट' म्हणून काम करते आणि घराच्या आसपासच्या हवेतील जंतू नष्ट करण्यास मदत करते. हे तसंच काम करतं जसं एखाद्या घरात आपण फ्रेग्नेन्स डिफ्यूजर वापरतो.
advertisement
5/9
बहुतेक झाडे रात्रीच्या वेळी कार्बन डायऑक्साइड सोडतात. जरी तुळस ही अपवादात्मक रित्या जास्त ऑक्सिजन देते, तरीही सायंकाळच्या संधीप्रकाशात झाडाभोवती असलेल्या हवेच्या थरात बदल होत असतो. दिव्याच्या ज्योतीमुळे निर्माण होणारी उष्णता हवेला हलकी करते, ज्यामुळे हवेचा प्रवाह खेळता राहतो. यामुळे तुळशीच्या आसपास कार्बन डायऑक्साइड साचून न राहता खेळती हवा मिळते, जी आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः श्वसनासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
advertisement
6/9
प्राचीन काळी जेव्हा विजेचे दिवे नव्हते, तेव्हा सायंकाळचा काळ हा 'संधीप्रकाश' मानला जायचा. दिवसाचा उजेड संपत असताना आणि पूर्ण अंधार पडण्यापूर्वीचा हा काळ डोळ्यांवर ताण देणारा असतो. तुळशीसमोर लावलेला दिवा हा घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा मध्यभागी असतो. हा सौम्य प्रकाश मनाला शांतता देतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक लहरी (Positive Vibrations) निर्माण करतो. मानसशास्त्राच्या दृष्टीनेही, दिव्यातील मंद ज्योतीकडे पाहिल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते.
advertisement
7/9
तुळस ही 'Oxygen Generator' मानली जाते. सायंकाळी तुळशीजवळ बसून दिवा लावल्याने किंवा तिथे काही वेळ थांबल्याने आपल्याला शुद्ध हवेचा पुरवठा होतो. वातावरणातील ओझोन थराचे रक्षण करण्यापासून ते प्रदूषण कमी करण्यापर्यंत तुळशीचे योगदान मोठे आहे. दिवा लावण्याच्या प्रथेमुळे आपण किमान दिवसातून दोनदा तरी या वनस्पतीजवळ जातो, तिची काळजी घेतो आणि पर्यायाने स्वतःच्या आरोग्याचीही निगा राखतो.
advertisement
8/9
थोडक्यात सांगायचे तर, तुळशीसमोर दिवा लावणे ही केवळ अंधश्रद्धा नसून ती एक निसर्गाशी जोडलेली 'हेल्थ टिप' आहे. आपल्या ऋषीमुनींनी विज्ञानाला धर्माची जोड दिली जेणेकरून सामान्य माणसाने आपल्या आरोग्यासाठी या नियमांचे पालन आनंदाने करावे. त्यामुळे आजपासून जेव्हा तुम्ही तुळशीसमोर दिवा लावाल, तेव्हा त्यामागील हे 'मास्टर सायन्स' नक्की आठवा.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पु्ष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
संंध्याकाळी तुळशीसमोर दिवा का लावला जातो? केवळ धर्मिक नाही, यामागे दडलंय मोठं शास्त्रीय कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल