IND vs ENG : भारताने मॅच गमावली होती, मग सूर्याने खेळला जुगार; 16व्या ओव्हरला काय झाले, कशी मॅच फिरवली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जेकॉब बेथेलच्या विकेटनंतर मॅच फिरली असे बोलता येणार नाही कारण खरी मॅचही 16 व्या ओव्हरला फिरली होती. त्यामुळे ही मॅच कशी फिरली? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/9

वानखेडेवर रंगलेल्या अटीतटीच्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाने अवघ्या 7 धावांनी इंग्लंडचा पराभव केला आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाने फायनलमध्ये एंन्ट्री मारली आहे.
advertisement
2/9
खरं तर भारताने दिलेल्या 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड फक्त 246 धावांपर्यंतच मजल मारू शकली होती.त्यामुळे भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला होता.
advertisement
3/9
इंग्लंडकरून जेकॉब बेथेलने 48 बॉलमध्ये 105 धावांची वादळी खेळी करून टीम इंडियाच्या पोटात गोळा आणला होता. पण शेवटच्या ओव्हरमध्ये तो रनआऊट झाल्याने भारताच्या पारड्याच मॅच आली होती.
advertisement
4/9
पण जेकॉब बेथेलच्या विकेटनंतर मॅच फिरली असे बोलता येणार नाही कारण खरी मॅचही 16 व्या ओव्हरला फिरली होती. त्यामुळे ही मॅच कशी फिरली? हे जाणून घेऊयात.
advertisement
5/9
त्याचं झालं असं की ज्याप्रमाणे जेकॉब बेथेल फलंदाजी करत होता, ते पाहता टीम इंडिया मॅच हारेल असे वाटत होते. पण याच दरम्यान सूर्याने जुगार खेळत बुमराहला 16वी ओव्हर दिली. खरं तर बुमराह डेथ ओव्हरला गोलंदाजी करतो. पण सूर्याने त्याला ओव्हर देऊ केली आणि या ओव्हरने खरी मॅच फिरली.
advertisement
6/9
कारण बुमराहच्या 16 व्या ओव्हरला फक्त 8 धावा आल्या.त्यामुळे धावांचा ओघ कमी झाला.त्यानंतर अर्शदिपच्या 17 व्या ओव्हरला इंग्लंडने 16 धावा काढल्या होत्या.त्यामुळे मॅच पुन्हा फसली होती.
advertisement
7/9
पण पुन्हा बुमराह 18 व्या ओव्हरला गोलंदाजीसाठी आला.या ओव्हरमध्ये त्याने 6 धावा दिल्या. बुमराहने या शेवटच्या दोन ओव्हरला 14 आणि संपूर्ण 4 ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या होत्या.
advertisement
8/9
बुमराहच्या याच दोन ओव्हरने इंग्लंडवर दबाव वाढला आणि धावांचा पाठलाग करायच्या तणावात जेकॉब बेथेल रनआऊट झाला आणि तिकडे जवळपास टीम इंडियाने मॅच जिंकली होती.
advertisement
9/9
दरम्यान भारताने हा सामना जिंकल्याने ते फायनला पोहोचले होते. तर बुधवारी साऊथ आफ्रिकेचा पराभव करून न्यूझीलंड फायनलला पोहोचली होती. त्यामुळे आता 8 मार्चला 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनलची लढत होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs ENG : भारताने मॅच गमावली होती, मग सूर्याने खेळला जुगार; 16व्या ओव्हरला काय झाले, कशी मॅच फिरवली