TRENDING:

IND vs SA : 358 करूनही जिंकलेली मॅच हारले, टीम इंडियाच्या पराभवाचे पाच व्हिलन

Last Updated:
रायपूरच्या मैदानावर टीम इंडियाने दिलेल्या 358 धावांच्या भल्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून साऊथ आफ्रिकेने हा सामना 4 विकेटस राखून जिंकला आहे.
advertisement
1/5
IND vs SA : 358 करूनही जिंकलेली मॅच हारले, टीम इंडियाच्या पराभवाचे पाच व्हिलन
भारताच्या पराभवाला अनेक खेळाडू कारणीभूत ठरले आहेत.पहिला खेळाडू टीम इंडियाचा सिनिअर ऑलराऊंडवर रविंद्र जडेजा ठरला. विराट बाद झाल्यानंतर टीम इंडिया 300 च्या आसपास होती.इथुन उरलेल्या 10 ओव्हरमध्ये टीम इंडिया 400 चा पल्ला गाठू शकली असती.पण जडेजाच्या संथ खेळीमुळे टीम इंडियाला 358 धावावर समाधान मानावे लागले.
advertisement
2/5
रविंद्र जडेजासह वॉशिंग्टन सुंदर देखील पराभवास कारण ठरला आहे.कारण कोणताही प्रेशर नसताना वॉशिंग्टन सुंदर अवघ्या 1 धावावर बाद झाला होता. तो जर मैदानात असता तर भारताने आणखी अतिरीक्त 42 धावा करून 400 चा पल्ला गाठला असता.
advertisement
3/5
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल फलंदाजीत फारशी कामगिरी करू शकला नाही.आणि फिल्डींग दरम्यान त्याने मोठी चूक केली.एडम मार्करम 52 वर खेळत असताना जयस्वालने बाऊंड्री लाईनवर त्याची कॅच ड्रॉप केली. त्यानंतर मार्करमने शतक ठोकलं होते.त्यामुळे हे शतक भारताला भारी पडलं.
advertisement
4/5
टीम इंडियाचा कर्णधार के एल राहुल देखील पराभवास जबाबदार ठरला आहे.कारण विकेट मागे किंपिंग करत असताना के एल राहुलने दोन सोप्पे विकेटकिंपिंग सोडले होते.जर हे विकेट मिळाले असतं तर भारत सामना जिंकला असता.
advertisement
5/5
टीम इंडियाचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात खूपच महागडा ठरला. प्रसिद्ध कृष्णाची साऊथ आफ्रिकेने प्रचंड धुलाई केली.वॉशिग्टनने 8.2 ओव्हरमध्ये 85 धावा दिल्या. या धावा देखील पराभवास कारणीभूत ठरतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs SA : 358 करूनही जिंकलेली मॅच हारले, टीम इंडियाच्या पराभवाचे पाच व्हिलन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल