Success Story: मुंबईतील नोकरी सोडून केली शेती, युवा शेतकऱ्याचं पिवळं सोनं थेट अमेरिकेच्या कंपनीत
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईतील नोकरी सोडून पुन्हा मातीत शिरण्याचा तिचा निर्णय थोडा रिस्की होता. मात्र तिने जिद्दीच्या जोरावर तिने आज शेतात सोनं घेतलं आणि ते अमेरिकेतली कंपनीपर्यंत पोहोचलं देखील. अमेरिकेतील कंपनीकडून देखील त्यांचं कौतुक होत आहे. या तरुण आणि युवा शेतकऱ्याचं नाव प्रियांका सुराणा आहे. तिने शेतात सोनं पिकवलं आणि जगभरात आज त्याची चर्चा होत आहे.
advertisement
1/8

राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील २७ वर्षीय युवा शेतकरी प्रियांक सुराणा यांनी शेतात बटाटा लावून कमाल केली. त्यांचे बटाटे आता थेट अमेरिकेतील कंपन्यांना चिप्स बनवण्यासाठी वापरले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रचंड जिद्द यांचा मेळ घातल्यास शेती आंतरराष्ट्रीय यश मिळवून देऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिलं.
advertisement
2/8
प्रियांकच्या वडिलांना वाटत होते की मुलाने मोठा व्यवसाय करावा. प्रियांक मुंबईत डिजिटल मार्केटिंगची चांगली नोकरी करत होता, पण त्याने आपली दिशा बदलण्याचा निर्णय घेतला. त्याने शेतीला आपले नवीन करिअर म्हणून निवडले.
advertisement
3/8
२०२३ मध्ये, त्याने केवळ ३ बिघा जमिनीवर ८० हजार किलोपेक्षा जास्त बटाट्याचे उत्पादन घेतले. प्रियांकने कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार मातीची गुणवत्ता सुधारली, तसेच शेतात ड्रिप सिस्टीम आणि बोअरवेलची व्यवस्था केली. या तांत्रिक बदलांमुळे उत्पादन आणि पिकाची गुणवत्ता या दोन्हीत अभूतपूर्व सुधारणा झाली.
advertisement
4/8
प्रियांकच्या बटाट्याची गुणवत्ता इतकी उत्कृष्ट निघाली की, अमेरिकेतील एका कंपनीने थेट त्याच्या शेतातून बटाटे खरेदी करण्यास सुरुवात केली. आता प्रियांकच्या शेतात पिकलेले बटाटे विदेशी ब्रँड्सच्या चिप्समध्ये वापरले जात आहेत.
advertisement
5/8
हे यश केवळ प्रियांकचे वैयक्तिक यश नसून, 'शेती फायदेशीर नाही' असे मानणाऱ्या संपूर्ण राजस्थानच्या शेतकऱ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरले आहे. योग्य बियाणे आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीचे उत्पादन जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येते, हे प्रियांकने सिद्ध केले आहे.
advertisement
6/8
आपल्या या बदलामागची कहाणी सांगताना प्रियांक म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात त्यांनी कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे अनेकांना जीव गमावताना पाहिले. तेव्हा त्यांच्या मनात ही गोष्ट पक्की बसली की, शुद्ध अन्न हेच खऱ्या आरोग्याचा आधार आहे. मुंबईतील चांगली नोकरी सोडून त्या गावी परतल्या आणि पूर्णपणे ऑरगॅनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा उद्देश केवळ नफा कमावणे नसून, लोकांना शुद्ध आणि आरोग्यवर्धक उत्पादने पुरवणे हा आहे.
advertisement
7/8
आता प्रियांक केवळ बटाटेच नाही, तर गहू, हिरव्या भाज्या आणि फळे देखील पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवत आहेत. यासोबतच, शहरी लोक आणि तरुणांना शेतीची प्रक्रिया जवळून समजावी आणि त्यांना निसर्गाशी जोडता यावे, यासाठी ते आपल्या गावात एक रिसॉर्ट विकसित करून 'ॲग्रो टुरिझम' लाही प्रोत्साहन देत आहेत.
advertisement
8/8
प्रियांकचे वडील संजय सुराणा, जे स्वतः रिअल इस्टेट व्यवसायाशी जोडलेले आहेत, ते सांगतात की, सुरुवातीला मुलाच्या हट्टाबद्दल त्यांना चिंता वाटत होती आणि त्याचा हा निर्णय समजला नव्हता. पण, आज मुलाची तीच जिद्द गाव आणि देश दोघांसाठीही एक मोठे उदाहरण बनली आहे. आज त्यांना आपल्या मुलाचा खूप गर्व वाटतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Success Story/
Success Story: मुंबईतील नोकरी सोडून केली शेती, युवा शेतकऱ्याचं पिवळं सोनं थेट अमेरिकेच्या कंपनीत