Alert! 38000 किमी वेगाने येतंय संकट, भारतातील शहरं धोक्यात, सगळं काही उद्ध्वस्त होणार
- Published by:Priya Lad
Last Updated:
Asteroid may hit earth : हे संकट उत्तर दक्षिण अमेरिकेपासून पॅसिफिक महासागर, दक्षिण आशिया, अरबी समुद्र आणि आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या प्रदेशात कुठेही येऊ शकतं. भारतालाही याचा धोका आहे.
advertisement
1/7

पृथ्वीच्या विनाशाबद्दल तुम्ही अनेक भाकितं ऐकली असतील. काही भाकीतं अशी असतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. कारण स्वतःला भविष्यवक्ता म्हणवणाऱ्यांनी ही भाकीतं केलेली असतात. ती कितपत खरी ठरतील माहिती नाही. पण आता शास्त्रज्ञांनी भाकित केलं आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पृथ्वीच्या दिशेने ताशी 38000 किमीने संकट येत आहे.
advertisement
2/7
अ‍ॅस्टेरॉइड 2024 वायआर4 नावाचा एक लघुग्रह अवकाशातून येत आहे, जो 100 मीटर रुंद आहे. डिसेंबर 2032 मध्ये तो पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल. त्याचा वेग ताशी 38000 किमी असेल. हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
शास्त्रज्ञांच्या मते, पूर्वी त्याची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता फक्त 1.3 टक्के होती, परंतु आता ती 2.3 टक्के करण्यात आली आहे. सध्या तो पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर आहे, त्यामुळे तो जसजसा जवळ येईल तसतसा धोका वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की त्याच्या धडकेमुळे हवेतच एक भयानक स्फोट होईल. त्यानंतर तो सुमारे 8 दशलक्ष टन टीएनटी ऊर्जा सोडेल. जी हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा 500 पट जास्त विनाश करेल. सुमारे 50 किलोमीटर परिसरातील सर्व काही जळून राख होईल.
advertisement
5/7
जर तो पृथ्वीवर आदळला तर तो अनेक शहरं नष्ट करेल. नासाच्या कॅटालिना स्काय सर्व्हे प्रोजेक्टमधील अभियंता डेव्हिड रँकिन सारख्या काही तज्ज्ञांनी हा लघुग्रह कुठे पडू शकतो हे संभाव्य ठिकाण ओळखलं आहे.
advertisement
6/7
त्यांच्या मते, हा लघुग्रह उत्तर दक्षिण अमेरिकेपासून पॅसिफिक महासागर, दक्षिण आशिया, अरबी समुद्र आणि आफ्रिकेपर्यंत पसरलेल्या प्रदेशात कुठेतरी पडू शकतो.
advertisement
7/7
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इथिओपिया, सुदान, नायजेरिया, व्हेनेझुएला, कोलंबिया आणि इक्वेडोरसारखे देश त्याच्या कार्यक्षेत्रात आहेत. म्हणजेच तो भारतातील कोणत्याही शहरावरही पडू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Alert! 38000 किमी वेगाने येतंय संकट, भारतातील शहरं धोक्यात, सगळं काही उद्ध्वस्त होणार