राजू असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे. त्याची पत्नी मीरा हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ती पसार झाली आहे. याबाबत २२ वर्षांच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू आणि मीरा यांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये काम लावून देतो, असे आमिष दाखवलं. दोघींना जवळपास १७०० किलोमीटरचा प्रवास करून पश्चिम बंगालमधील एका गावातून पुण्यात आणलं. दोघींना ब्युटी पार्लरमध्ये काम करायचं होतं, पण आरोपींनी त्यांना पार्लरमध्ये कामाला न लावता दोघींना वेश्याव्यवसायात ढकललं. दोघींनी वेश्याव्यवसाय करायला नकार देताच आरोपींनी त्यांना डांबून ठेवलं. धमकावून शिवीगाळ केली. मारहाण करून छळ केला. तसेच त्यांना उपाशी ठेवले. मागील दोन वर्षांपासून आरोपी त्यांच्याकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेत होते.
advertisement
घटनेला वाचा कशी फुटली?
आरोपी दलालाने गेल्या आठवड्यात आंबेगाव पठार भागात एका तरुणीला देहव्यापारासाठी आणलं होतं. या तरुणीने संधी साधून मोबाइल क्रमांकावरून पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपासपथकाला तरुणीचा शोध घेण्याचा आदेश दिला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आरोपीच्या ताब्यातून फिर्यादी तरुणीसह दोघींची सुटका करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.