दसऱ्याच्या आदल्या दिवशी काय घडलं?
दोघेही पती-पत्नी शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. पत्नीचा खून केल्यानंतर अशोक गावडे यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. दसऱ्याच्या आदल्या दिवशी गावडे यांच्या घरातच पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास या वादातून अशोक गावडे यांनी पत्नी जयश्रीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.
advertisement
नवऱ्याने स्वत:ला संपवलं
अपराधीपणाची भावना मनात आल्यामुळे नवऱ्याने स्वत:ला देखील संपवलं. अशोक यांनी राहत्या घरातील फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. सकाळी गावकऱ्यांना ही घटना समजताच एकच खळबळ उडाली. ऐन सणासुदीत अशा घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेचं नेमकं कारण स्पष्ट
दरम्यान, घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. याबाबत माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे. मात्र, गावात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं आहे.