TRENDING:

PanchTatva: शरीर पंचतत्वात विलीन झालं असं म्हणतात; म्हणजे नेमकं काय? ग्रहांशी कसा येतो संबंध

Last Updated:

PanchTatva: पंच महाभूतांची उत्पत्ती साक्षात भगवान शिव यांनी केली. ज्या पाच तत्त्वांनी हे ब्रह्मांड बनलं आहे, तीच पाच तत्त्वे मानवी शरीराच्या निर्मितीचा कारक आहेत. पाच तत्त्वांना वैदिक भाषेत पंचतत्त्व किंवा पंचमहाभूते म्हणतात. ही पाच तत्त्वे म्हणजे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मानवी शरीर पाच तत्त्वांनी किंवा पंचमहाभूतांनी बनलेले आहे, ज्यांची उत्पत्ती साक्षात भगवान शिव यांनी केली. ज्या पाच तत्त्वांनी हे ब्रह्मांड बनलं आहे, तीच पाच तत्त्वे मानवी शरीराच्या निर्मितीचा कारक आहेत. पाच तत्त्वांना वैदिक भाषेत पंचतत्त्व किंवा पंचमहाभूते म्हणतात. ही पाच तत्त्वे म्हणजे - पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि शेवटी आकाश. जर आपण या पाच तत्त्वांशी संबंधित ग्रह संतुलित ठेवले, तर आपल्या शरीरातील पाच तत्त्वे देखील संतुलित राहू शकतात. या पाच महाभूत तत्त्वांमुळेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे.
News18
News18
advertisement

पंचमहाभूते आणि त्यांचा ग्रहांशी संबंध

पृथ्वी - पंचतत्त्वांमध्ये सर्वात आधी येते पृथ्वी तत्त्व, जे एखाद्या व्यक्तीचे भौतिक शरीर तयार करते. शरीरात प्राण यावेत आणि शरीर निरोगी व ऊर्जावान राहावे यासाठी उर्वरित 4 तत्त्वे आवश्यक आहेत. शरीरातील पृथ्वी तत्त्वाचा कारक ग्रह बुध आहे, जो शरीराची स्थिरता, हाडांची रचना आणि त्वचेशी संबंधित आहे.

advertisement

जल - पाच महाभूत तत्त्वांपैकी जल तत्त्व हे शरीरासाठी एक महत्त्वाचे तत्त्व आहे. ते शरीराला केवळ शक्तीच देत नाही, तर शरीराचा 70 टक्के भाग हा पाणीच आहे. पाणी संपूर्ण शरीरात आणि रक्तातही असते, ज्याशिवाय जीवन शक्य नाही. जल तत्त्वाचा कारक ग्रह शुक्र आणि चंद्र आहेत. शरीरातील जलावर चंद्राचा खूप प्रभाव असतो.

advertisement

अग्नी - अग्नी तत्त्व हे जलाप्रमाणेच शरीराला ऊर्जा देते. शरीराची हालचाल, फिट राहणे, योग करणे हे अग्नीमुळेच शक्य होते. शरीर निरोगी ठेवण्यास अग्नी तत्त्व मदत करते. अग्नी तत्त्वाचे कारक ग्रह मंगळ आणि सूर्य आहेत. यांना भक्कम केल्याने शरीर निरोगी राहते आणि शरीराला शक्ती मिळते.

advertisement

लग्नच होत नाही? पर्याय नाही म्हणण्यापेक्षा पोवळं घालून बघा! मंगळ दोषावर करतं काम

वायू - पंचमहाभूतांमध्ये वायू हे देखील शरीराचे महत्त्वाचे तत्त्व आहे. शरीरात प्राणांचा जो काही संचार होत आहे, त्याचे कारण वायू तत्त्वच आहे, ज्याला आयुष्यही म्हटले गेले आहे. वायू तत्त्वाचा स्वामी ग्रह शनि आहे. शनि मजबूत असल्यास शरीरात वायू तत्त्वाचा संचार चांगल्या प्रकारे होतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

आकाश - पाच महाभूतांपैकी एक आहे आकाश तत्त्व, ज्याला आत्म्याचे वाहन म्हटले गेले आहे. बाकीची 4 तत्त्वे याच तत्त्वात सामावलेली आहेत. याच आकाश तत्त्वाच्या माध्यमातून साधना केली जाते, ज्याला भौतिक रूपात मन असेही म्हणतात. आकाश तत्त्वाचा स्वामी गुरु बृहस्पती आहे. गुरु ग्रह शुद्ध आणि मजबूत ठेवल्याने आकाश तत्त्व मजबूत राहते.

मराठी बातम्या/अध्यात्म/
PanchTatva: शरीर पंचतत्वात विलीन झालं असं म्हणतात; म्हणजे नेमकं काय? ग्रहांशी कसा येतो संबंध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल