तब्बल 37 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय
न्यूझीलंड संघ 1988 पासून भारताचा दौरा करत आहे, मात्र मागील सात दौऱ्यांत त्यांना एकदाही वनडे मालिका जिंकता आली नव्हती. तब्बल आठव्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळालं असून त्यांनी भारताचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. यापूर्वी 2023 मध्ये जेव्हा किवी संघ भारतात आला होता, तेव्हा भारताने त्यांना 3-0 ने व्हाईटवॉश दिला होता, मात्र गंभीरच्या मार्गदर्शनाखाली हा इतिहास बदलला आणि भारतावर मानहानीकारक पराभवाची वेळ आली. तब्बल 37 वर्षांचा रेकॉर्ड किवींनी मोडलाय.
advertisement
25 वर्षांनंतर पहिल्यांदाच...
गंभीरच्या कार्यकाळात केवळ वनडेच नव्हे, तर टेस्ट क्रिकेटमध्येही भारताची कामगिरी खालावली आहे. 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मालिका गमावली. यापूर्वी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतात टेस्ट मालिका जिंकली होती, तोच नकोसा रेकॉर्ड आता पुन्हा एकदा प्रस्थापित झाला आहे. तसेच श्रीलंकेत 27 वर्षांनंतर भारताला वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला, जे भारतीय क्रिकेटसाठी मोठं अपयश मानलं जातंय.
भारतीय क्रिकेटसाठी सर्वात मोठा
मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धची 3-0 अशी टेस्ट मालिकेतील हार हा भारतीय क्रिकेटसाठी सर्वात मोठा धक्का ठरला. या निकालामुळे भारताची घरच्या मैदानावर 12 वर्षे अजिंक्य राहण्याची मालिका संपुष्टात आली. 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारत भारतात कधीच टेस्ट सिरीज हरला नव्हता, मात्र 2024 मध्ये हा रेकॉर्डही मोडीत निघाला. इतकेच नव्हे तर, तब्बल 10 वर्षे भारताकडे असलेली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3-1 च्या पराभवामुळे हातातून निसटली होती. त्यामुळे आता गंभीरच्या कोचिंगवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतायेत.
