TRENDING:

IND vs WI : टीम इंडियाचे 4 खेळाडू ठरले अनलकी,लाहोर ते मुंबईपर्यंत झाला क्रिकेटर्सचा हार्टब्रेक

Last Updated:

यशस्वी जयस्वाल 175 धावांवर रनआऊट झाला. इतक्या मोठ्या धावा करताना एखादा खेळाडू रनआऊट होतो हे काही पहिल्यांदा घडलं नाही. जयस्वाल आधी या खेळाडूंच्या बाबतीत हे असचं घडलं होतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India vs West Indies 2nd Test : दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडीअमवर सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने आपला पहिला डाव 5 विकेट 518 धावांवर घोषित केला आहे. या धावा करताना भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालला द्विशतक करण्याची संधी होती. पण तो 175 धावांवर रनआऊट झाला. इतक्या मोठ्या धावा करताना एखादा खेळाडू रनआऊट होतो हे काही पहिल्यांदा घडलं नाही. जयस्वाल आधी या खेळाडूंच्या बाबतीत हे असचं घडलं होतं.त्यामुळे लाहोरपासून मुंबईपर्यंत भारतीय फॅन्सचा हार्टब्रेक झाला आहे. त्यामुळे हे खेळाडू नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
 yashasvi Jaiswal
yashasvi Jaiswal
advertisement

खरं तर यशस्वी जयस्वाल आधी अनेक भारतीय खेळाडू असे आहेत ज्यांनी खूप मोठ्या धावा केल्या त्यानंतर ते द्विशतकाच्या उंबरठ्यावर किंवा आसपास होते,त्याचवेळी एका रनआऊटने त्यांचा घात केला होता.त्यामुळे हे खेळाडू अनलकी ठरले होते.

या क्रमवारीत भारताते माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर हे पहिल्या स्थानी येतात. कारण 1989 मध्ये लाहोरमध्ये पार पडलेल्या पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात संजय मांजरेकर यांनी 218 धावा केल्या होत्या. या धावा केल्यानंतर ते 250 करतील असे वाटत असताना ते रनआऊट होतात.

advertisement

इंग्लंड विरूद्ध ओव्हलच्या मैदानात भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने 217 धावा केल्या होत्या.या धावा केल्यानंतर राहुल द्रविड 250 करतील असे वाटत असताना तो रनआऊट झाला होता. हा सामना 2002 मध्ये पार पडला होता. त्यामुळे द्रविड या क्रमांकावर दुसऱ्या स्थानी होता.

या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी राहुल द्रविडच आहे. कारण 2001 साली कोलकत्ताच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सामना पार पडला होता.या सामन्यात राहुल द्रविड 180 धावा करून रनआऊट झाला होता.त्यामुळे तो अनलकी ठरला होता.

advertisement

चौथ्या स्थानी कमनशीबी ठरण्यात यशस्वी जयस्वाल आहे. कारण 2025 मध्ये दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर सुरू असलेल्या सामन्यात जयस्वाल 175 धावांवर रनआऊट झाला होता.खरं तर जयस्वाल हमखास द्विशतक ठोकू शकला असता पण तो रनआऊट झाला.

पाचवा नंबर हा विजय हजारे यांचा लागतो. कारण 1951 साली मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर इंग्लंडविरूद्ध पार पडलेल्या सामन्यात विजय हजारे 155 धावा करून रनआऊट झाले होते.

advertisement

त्यानंतर सहाव्या स्थानी पुन्हा राहुल द्रविडचा नंबर लागतो. 2009 मध्ये कानपूरच्या मैदानात श्रीलंकेविरूद्ध सूरू असलेल्या सामन्यात द्रविडने 144 धावा केल्या होत्या. त्यामुळे ते 150 धावा करेल असे वाटत होते पण तो रनआऊट वर बाद झाला होता.

त्यामुळे अशाप्रकारे हे भारताचे चार खेळाडू आहेत, जे मोठ्या धावा करूनही रनआऊटवर बाद झाले होते. त्यामुळे हे खेळाडू क्रिकेट वर्तुळात कमनशिबी ठरले होते.

advertisement

सर्वाधिक धावसंख्येवर रनआऊट होणारे भारतीय खेळाडू

218- संजय मांजरेकर विरुद्ध पाकिस्तान, लाहोर, 1989

217- राहुल द्रविड विरुद्ध इंग्लंड, ओव्हल,2002

180- राहुल द्रविड विरुद्ध ऑस्ट्रेलिया,कोलकाता,2001

175 - यशस्वी जयस्वाल विरुद्ध वेस्ट इंडिज, 2025 मध्ये दिल्ली

155- विजय हजारे विरुद्ध इंग्लंड, मुंबई (ब्रेबॉर्न स्टेडियम) 1951

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

144- राहुल द्रविड विरुद्ध श्रीलंका, 2009 मध्ये कानपूर

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : टीम इंडियाचे 4 खेळाडू ठरले अनलकी,लाहोर ते मुंबईपर्यंत झाला क्रिकेटर्सचा हार्टब्रेक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल